Hindi mandatory Third Languag : तिसरी भाषा शिकण्यात गैर काय?
राज्यात केवळ दोन भाषा शिकविण्याचा आग्रह चुकीचा आहे. संपूर्ण देशात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) तीन भाषांचे सूत्र लागू असेल तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. तिसरी भाषा शिकण्यात गैर काय, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या सक्तीला सर्वच स्तरातून होत असलेल्या विरोधामुळे पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला आहे, मात्र त्याचवेळी पहिलीपासून पाचवीपर्यंत हिंदीऐवजी अन्य भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्याचा पर्याय दिला आहे. या निर्णयासही मोठय़ा प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशभरात तीन भाषांचे सूत्र असेल तर महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List