धुळे विश्रामगृहात सापडलेल्या घबाडाचे प्रकरण दडपले का? संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल

धुळे विश्रामगृहात सापडलेल्या घबाडाचे प्रकरण दडपले का? संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल

धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या 1 कोटी 85 लाखांच्या घबाडाचे प्रकरण दडपले का, असा थेट सवाल शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. सखोल तपास झाला नाही तर नाइलाजाने या प्रकरणातील आणखी स्पह्ट करावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारे हे प्रकरण माजी आमदार अनिल गोटे यांनी उघड केले होते. यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणातील अनेक गोष्टी निदर्शनास आणल्या आहेत. 21 मेच्या मध्यरात्री धुळे जिह्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या 102 नंबरच्या खोलीत 1 कोटी 85 लाखांचे घबाड सापडले. त्या खोलीतून तीन कोटी रुपये आधीच बाहेर नेले व 10 कोटी जालन्यात पोहोचवले होते. धुळे दौऱयावर आलेल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या ‘पीए’च्या खोलीत ही रक्कम होती व धुळ्यातील ठेकेदारांकडून अंदाज समितीच्या अध्यक्षांना ‘नजराणा’ देण्यासाठी खंडणीरूपाने 15 कोटी रुपये जमा करण्यात आले, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

एसआयटीची घोषणा ही निव्वळ धूळफेक

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्याची वरपांगी घोषणा आपण केली. त्या एसआयटीचे पुढे काय झाले? त्याचे प्रमुख कोण? हे समजले नाही. त्यामुळे एसआयटीची घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी या पत्रात केला आहे.

फक्त एनसी नोंदवून प्रकरण दडपले

खंडणीरूपाने जमा केलेल्या या रकमेबाबत एक साधा ‘अदखलपात्र’ गुन्हा दाखल करण्यात आला व प्रकरण दडपण्यात आले असे आता समोर आले आहे. ही बाब लाजीरवाणी असून मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किती गंभीर आहेत हे दर्शविणारे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

रेशन दुकानदारांना धमकावून पैसे जमा

धुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱयाने तोंडी आदेश देऊन रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी 10000 प्रमाणे 1 कोटी 47 लाख रुपये गोळा केले. ही रक्कम फक्त तीन तासांत गोळा केली. पैसे जमा झाले नाहीत तर ‘समिती’चे सदस्य दुकानांवर रेड टाकतील, असे निरोप देण्यात आले व त्यानंतर पैसे जमा केले. याबाबतची अधिक माहिती आपण देऊ शकतो, असे संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

अर्जुन खोतकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ आणि ‘पीए’ना पद्मश्री द्या

आपल्या राज्यात हे असेच चालणार असेल तर राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते बरखास्त करून मोकळे व्हा व भ्रष्ट अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ व त्यांचे ‘पीए’ किशोर पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून राज्यातील भ्रष्टाचाऱयांचा बहुमान करा, असा टोलाही संजय राऊत यांनी या पत्रात लगावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॉल आणि इंटरनेट खर्चात आठ टक्क्यांची वाढ, सीएमआयईच्या अहवालातून आकडेवारी समोर कॉल आणि इंटरनेट खर्चात आठ टक्क्यांची वाढ, सीएमआयईच्या अहवालातून आकडेवारी समोर
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या एका अहवालात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कॉल...
Intel मध्ये पुन्हा एकदा मोठी कपात, 10 हजारांहून अधिकांना घरचा रस्ता दाखवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात, सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलानंतरच मंजूरी
एसंशिं गटाचे अघोरी उद्योग कुणासाठी… संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केलं सावध
Vasai News: वसई नवघर पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट
Traffic Alert- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे! शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलंय!! – संजय राऊत