मुंबईकरांसाठी ‘थेंबे थेंबे तळे साचे’! तलाव क्षेत्रात धुवांधार, पवई ओव्हरफ्लो

मुंबईकरांसाठी ‘थेंबे थेंबे तळे साचे’! तलाव क्षेत्रात धुवांधार, पवई ओव्हरफ्लो

मुंबईकरांना पाणी पुरवठा होणाऱया सात तलावांमध्ये सध्या जोरदार पाऊस होत असल्यामुळे 8 टक्क्यांपर्यंत खाली आलेला जलसाठा आता 10.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. यातच पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक वापरासाठी उपयुक्त ठरणारे पवई तलाव आज ओव्हरफ्लो झाले.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे वर्षभराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी सातही तलाव ओसंडून वाहणे गरजेचे आहे. हे तलाव ओव्हरफ्लो झाले नाहीत तर मुंबईवर पाणीकपातीचे संकट येऊ शकते. मात्र सद्यस्थितीत पडणारा पाऊस पाहता या वर्षीदेखील सातही तलाव वेळेत तुडुंब होतील अशी आशा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॉल आणि इंटरनेट खर्चात आठ टक्क्यांची वाढ, सीएमआयईच्या अहवालातून आकडेवारी समोर कॉल आणि इंटरनेट खर्चात आठ टक्क्यांची वाढ, सीएमआयईच्या अहवालातून आकडेवारी समोर
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या एका अहवालात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कॉल...
Intel मध्ये पुन्हा एकदा मोठी कपात, 10 हजारांहून अधिकांना घरचा रस्ता दाखवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात, सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलानंतरच मंजूरी
एसंशिं गटाचे अघोरी उद्योग कुणासाठी… संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केलं सावध
Vasai News: वसई नवघर पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट
Traffic Alert- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे! शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलंय!! – संजय राऊत