तीन हजार रुपयांमध्ये वर्षभराचा फास्टॅग पास, खासगी वाहने टोलनाक्यांवर 200 वेळा करू शकणार प्रवास

तीन हजार रुपयांमध्ये वर्षभराचा फास्टॅग पास, खासगी वाहने टोलनाक्यांवर 200 वेळा करू शकणार प्रवास

केंद्र सरकारने तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग आधारित वार्षिक पासची योजना 15 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना कार, जीप, व्हॅन यांसारख्या गैरव्यावसायिक खासगी वाहनांसाठी लागू असेल. योजनेंतर्गत पासवर खासगी वाहने राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवरून वर्षभरात 200 वेळा प्रवास करू शकतील. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ही घोषणा केली.

टोल पेमेंट तसेच रस्ते प्रवास सुलभ करण्यासाठी फास्टॅग पास योजना सुरू केली जात आहे. फास्टॅग पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 फेऱयांपर्यत वैध राहणार आहे. आवर्ती टोल शुल्क कमी करून नियमित महामार्ग प्रवाशांचा खर्च कमी करण्याच्या हेतूने फास्टॅग पासचे डिझाइन केले आहे. त्रासमुक्त महामार्ग प्रवासासाठी एक क्रांतिकारक पाऊल म्हणून आम्ही 15 ऑगस्टपासून तीन हजार रुपयांत फास्टॅग आधारित वार्षिक पास योजना सुरू करणार आहोत, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ‘एक्स’वर आपल्या अधिकृत हॅण्डलवरून जाहीर केले. हा वार्षिक पास देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर चालणार आहे. पास सक्रिय व नूतनीकरण करण्यासाठी महामार्ग अॅप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर एक समर्पित लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वर्षभरात वाहनधारकांचे 10 हजार रुपये वाचणार

फास्टॅग पासमुळे वर्षभरात वाहनधारकांचे 10 हजार रुपये वाचणार आहेत. सध्या प्रत्येक टोलनाक्यावर 50 ते 80 रुपयांपासून पुढे टोल आकारला जातो. फास्टॅग पासमुळे तो फक्त 15 रुपये लागेल. यामुळे पैसे वाचण्याबरोबर वेळेची बचत होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. राज्य सरकार किंवा इतर सरकारी प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर हा पास चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे फायदे होणार

  • टोलनाक्यावर कर देण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
  • टोलनाक्यावरील वाहनधारकांची रखडपट्टी टळेल.
  • टोलनाक्यावर गर्दी नियंत्रणात राहिल्याने वाद होणार नाहीत.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रासह 4 राज्यांत कमी वजनाची बाळे महाराष्ट्रासह 4 राज्यांत कमी वजनाची बाळे
देशातील 47 टक्के कमी वजनाची बाळे उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि महाराष्ट्रात जन्मतात. 1993 पासून कमी वजनाच्या बाळांची संख्या 26...
अमरनाथ यात्रेच्या मार्गावर ड्रोनला बंदी
जेजुरीजवळ भीषण अपघात, कारची टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक; 8 ठार, 5 गंभीर
सखींनो तुमच्यामध्येही ही लक्षणं आढळताहेत का? ब्रेस्ट कॅन्सरचा असू शकतो धोका, वाचा
मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात लेटमार्कने, मुसळधार पावसामुळे लोकलची वाहतूक मंदावली
मुंबईला यलो अलर्ट, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
इराणमध्ये अडकलेले 110 विद्यार्थी हिंदुस्थानमध्ये परतले, दिल्लीत उतरताच व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ‘घरी जायचंय, पण…’