Pune Bridge Collapse : इंद्रायणी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीवर असलेला एक जुना लोखंडी पूल अचानक कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू झाला असून, 26 ते 30 पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
ही दुर्घटना दुपारी 3:30 च्या सुमारास घडली. कुंडमळा हे पर्यटकांमध्ये पावसाळ्यात विशेष लोकप्रिय असलेले ठिकाण आहे. रविवार असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होती. सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. हा पूल अनेक वर्षे जुना आणि गंजलेल्या अवस्थेत होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी पूलावर 100 ते 125 पर्यटक एकाच वेळी उपस्थित होते.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर 32 जण जखमी झाले आहेत. यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List