राज्यभरात पावसाचे धुमशान; रायगडला आज रेड अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज

राज्यभरात पावसाचे धुमशान; रायगडला आज रेड अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज

मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आज दिवसभर पावसाने बॅटिंग केली. पुढील 24 तासांत रत्नागिरी आणि रायगड जिह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून हवामान खात्याने या दोन्ही जिह्यांना ‘रेड अलर्ट’ दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिह्यालाही ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्यात आज सकाळपर्यंत रत्नागिरी जिह्यात सर्वाधिक 88.1 मि. मी. पावसाची नोंद झाली. रायगड जिह्यात 65.3 मिमी, सिंधुदुर्ग जिह्यात 53.8 मिमी, ठाणे 29.6 आणि यवतमाळ जिह्यात 17.5 मिमी पावसाची नोंद झाली.

वीज कोसळून 8 मृत्यू

मुंबईत वादळी वाऱयामुळे एक व्यक्ती जखमी झाली आहे. धुळे व नाशिक जिह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगर जिह्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. नंदुरबार जिह्यात एक मृत्यू व एक जखमी आणि अमरावती जिह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुण नाही पण वाण लागला, पावसाळ्यात मेट्रोची रखडपट्टी; ओव्हरहेड वायर तुटल्याने घाटकोपर-अंधेरी मार्गावर गोंधळ गुण नाही पण वाण लागला, पावसाळ्यात मेट्रोची रखडपट्टी; ओव्हरहेड वायर तुटल्याने घाटकोपर-अंधेरी मार्गावर गोंधळ
कधी तांत्रिक बिघाड, कधी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तर कधी पावसामुळे मध्य रेल्वे रखडते. आता मेट्रोलाही मध्य रेल्वेची लागण झाल्याचे दिसते....
Air India Plane Crash नंतर 33 पैकी 22 ड्रिमलायनर विमानांची तपासणी पूर्ण, महत्त्वाची माहिती आली समोर
प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा 27 जूनपासून सुरू होणार; 9 दिवस चालणार सोहळा
अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना परत पाठवण्यासाठी इराणचा मोठा निर्णय!
हिंदुस्थानची लोकसंख्या किती? लवकरच कळणार, केंद्र सरकारने काढली जनगणनेची अधिसूचना
नो टेन्शन!! मानेवरील काळे डाग आता होतील झटक्यात दूर, करा हे घरगुती उपाय
मावळ दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा – संजय राऊत