राजकोटवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली अवघ्या महिनाभरात भगदाड, चिऱ्यांनी बांधलेला पाया खचला; फडणवीस-मिंध्यांचा महाभ्रष्ट कारभार

राजकोटवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली अवघ्या महिनाभरात भगदाड, चिऱ्यांनी बांधलेला पाया खचला; फडणवीस-मिंध्यांचा महाभ्रष्ट कारभार

महायुती सरकारने केलेल्या निकृष्ट बांधकामामुळे आज मालवणच्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या चबुतऱ्याची जमीन खचून मोठे भगदाड पडले. पुतळा भक्कम आहे, पण चबुतऱ्याच्या चिरेबंदी पायालाच तडे गेल्याने पुतळ्याच्या सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. उद्घाटनानंतर अवघ्या महिनाभरातच हा प्रकार घडल्याने शिवप्रेमींमध्ये सरकारबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते, परंतु अवघ्या आठ महिन्यांत 26 ऑगस्ट 2024 रोजी तो 40 फुटांचा पुतळा कोसळून पडला होता. त्यानंतर महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत नवा पुतळा उभारला. ज्येष्ठ व ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांच्या देखरेखीखाली हा पुतळा उभारण्यात आला. दहा फुटी चबुतऱयासह तो पुतळा 93 फूट उंच आहे. त्याचे उद्घाटन 11 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. परंतु पुतळय़ाच्या उजव्या बाजूला चबुतऱयाजवळील जमिनीला भगदाड पडल्याने पुन्हा एकदा सरकारच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमी आणि नागरिकांकडून सरकारवर टीका होत आहे. सरकारने योग्य खबरदारी घेऊन महापुरुषांचे पुतळे उभारावेत, अशी मागणी होत आहे.

कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा

शासनाने पुतळे उभारणीसाठी एक धोरण ठरवले पाहिजे. शिल्पकार, वास्तुविशारद, कलाकार, संशोधक, साहित्यिक, दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचा सल्ला घेतला पाहिजे, असे इंद्रजीत सावंत म्हणाले. याप्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱयांवर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी मागणी करताना, आज मंत्रालयच पंत्राटदार चालवताहेत, ते फक्त चौरस फुटामध्ये फायदा किती मिळेल हेच बघतात, असा आरोपही इंद्रजीत सावंत यांनी केला.

किल्ल्यावरील पोलीस बंदोबस्त वाढवला

भगदाड पडलेल्या ठिकाणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच किल्ल्यावरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुसळधार पाऊस होत असल्याने चबुतऱयाच्या जमिनीखालील माती वाहून गेल्याने भगदाड पडल्याचा दावा प्रशासन करत आहे. शिवरायांच्या पुतळ्याला कोणताही धोका नसल्याचा दावाही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कुल चले हम…… दिड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर शाळा सुरु स्कुल चले हम…… दिड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर शाळा सुरु
अखेर दिड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारी शाळांमध्ये चिमरड्यांचा किलकिलाट सुरु झाला. पुण्यातील डीइएस शाळेत बालगोपाळांचे ढोल ताशाच्या गजरात, औक्षण करून...
Breaking – संशयास्पद!! तांत्रिक बिघाडानंतर एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँग-दिल्ली विमान हवेतूनच परतले
राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार हे पनवती सरकार, संजय राऊत यांचा घणाघात
बेताल वक्तव्ये टाळा, त्याच चुका पुन्हा पुन्हा करू नका; भाजप नेत्यांचे अमित शहांनी टोचले कान
लखनऊ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, लँडिंग दरम्यान विमानाच्या चाकातून ठिणग्या
Ratnagiri- संगमेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार! रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती, गोळवली आमकरवाडी येथे भूस्खलन
इराणला याची किंमत चुकवावी लागेल; तेल अवीवची पाहणी केल्यानंतर नेतान्याहू यांची गर्जना