रस्त्याची दुरावस्था प्रवाशांच्या जीवावर! एसटी बस घसरून उलटल्याने 15 प्रवासी जखमी

रस्त्याची दुरावस्था प्रवाशांच्या जीवावर! एसटी बस घसरून उलटल्याने 15 प्रवासी जखमी

सरकारच्या बेजबाबदारपणामुळे शहरांसह ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था जैसे थेच आहे. खडबडीत आणि तडे गेलेले रस्ते प्रवाशांच्या मुळावर उठत आहेत.याचाच प्रत्यय लातूर जिल्ह्यात पाहायला मिळाला. लातूर ते मुरूड या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कराड- लातूर ही एसटी बस घसरून उलटली. त्यामुळे जवळपास पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना मुरुड अकोला ते रामेगाव दरम्यान रात्री साडे आठच्या सुमारास घडली.

सध्या लातूर ते बोरगाव रस्त्याचे काम सुरू आहे. बुधवार दिनांक 4 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कराड वरून लातूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH 14 BT 4432 ही मुरुड आकोला ते रामेगाव आली असता चिखल व रस्त्यावरील चढउताराचा अंदाज न आल्यामुळे घसरली. यात एसटी चालकाने प्रसंग सावधान राखून गाडीचा वेग कमी केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. परंतु या करंडकाच्या नावात बदल...
Photo किल्ले रायगडावर उत्साहात संपन्न झाला शिवराज्यभिषेक दिन सोहळा
मिंधे गटात जाणे ही फार मोठी चूक, पण आता माझ्या माहेरी परतले; सुजाता शिंगाडे यांचा शिवसेनेत प्रवेश
आरोग्यासाठी ही इवलीशी वेलची ठरते अमृत, तज्ञांनी सांगितले याचे आरोग्यदायी फायदे
केमिकल पद्धतीने पिकवलेले कलिंगड कसे ओळखावे? ‘या’ 5 ट्रिक्स करतील काम
आयुर्वेदानुसार चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन एकत्र करू नयेत, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान