राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे, संजय राऊत यांची टीका

राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे, संजय राऊत यांची टीका

एकनाथ शिंदे जर त्या गाडीला बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजातून मी कशी उडी मारेन हे पाहतील. तसेच या राज्य सरकारची गाडी खिळखिळी झाली आहे असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे आपण कायम सांगतोय. पण युनाटेड नेशन्सने एका समितीचे उपाअध्यक्षपद पाकिस्तानकडे देत आहे. याचा अर्थ गेल्या 10 वर्षात आपले परराष्ट्र धोरण फसलं आहे. या साठी सर्वात आधी जयशंकर यांनी राजीनामा घेतला पाहिजे. संपूर्ण जगात हिंदुस्थानला कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे आणि त्यासाठी हे सरकार जबाबदार आहे. राहुल गांधींनी सांगितले आहे की हे सरेंडर आहे. तसेच भाजपचे नेते आपल्याच देशाला आणि देशवासियांना घाबरतात. हे लोक लोकशाहीला घाबरतात असेही संजय राऊत म्हणाले.

राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे. एकनाथ शिंदे जर त्या गाडीला बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजातून मी कशी उडी मारेन हे पाहतील असे संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस विचार करतील यांना ढकलून मी सगळी गाडी कशी ताब्यात घेईन? आणि या दोघांनी उडी मारल्यानंतर आपण कसे ड्रायव्हिंग सीटवर बसू असा विचार अजित पवार करत आहेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Buldhana News – पैशांची परतफेड केली तरीही सावकाराचा जाच सुरूच; शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवले Buldhana News – पैशांची परतफेड केली तरीही सावकाराचा जाच सुरूच; शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवले
मलकापुर तालुक्यातील धरणागावातील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी...
समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन
Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?
ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी