अशी ही पळवापळवी! लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 6 हजार 765 कोटींचा निधी पळवला!

अशी ही पळवापळवी! लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 6 हजार 765 कोटींचा निधी पळवला!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आमची चूक झाली, अशी जाहीर कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिली. पण या योजनेसाठी इतर विभागाच्या निधीची पळवापळवी मात्र थांबलेली नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकार डल्ला मारत आहे. आता या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6 हजार 765 कोटींचा निधीही महायुती सरकारने पळवला आहे.

काल म्हणाले, चूक झाली; आज श्रेय शिवराजसिंहांना; लाडकी बहीण योजना, अजित पवारांचे उल्टा पुल्टा

सरकारी तिजोरीत पैसे नसल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीच्या अंगलट आली आहे. दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यासाठी महायुतीची दमछाक होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6 हजार 765 कोटी रुपयांचा निधी वर्षभरात वळवला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीने कुठल्या विभागाचा किती निधी कसा पळवला? ते पुढील प्रमाणे…

लाडकी बहीण योजना महायुतीच्या अंगलट, नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकारचा डल्ला

> सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी 30 लाखांचा निधी दोन वेळा, म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवला
> आदिवासी विभागाचा आतापर्यंत 1 हजार 7 कोटी रुपयांचा निधी वळवला.
> दोन्ही विभागांचा मिळून आतापर्यंत 1827 कोटींचा निधी वळवला.
> वर्षभरात तब्बल 6 हजार 765 कोटी रुपयांचा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणार
> मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 1320 कोटी तर घरकुल योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना (ग्राम विकास ) 1485 कोटीही वळवणार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य? केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील