तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

पंतप्रधान मोदींनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानने फक्त माणुसकीवर हल्ला केलेला नाही तर कश्मीरच्या अस्मितेवरही हल्ला केला आहे. हिंदुस्थानात अशांतता आणि दंगली भडकवण्याची पाकिस्तानची इच्छा होती. पाकिस्तानला जम्मू कश्मीरमधील पर्यटन व्यवसायावर हल्ला करायचा आहे त्यामुळे इथल्या गोर गरीबांच्या पोटावर पाय आला असता. दहशतवाद्यांनी आदिल नावाच्या एका स्थानिक तरुणाचाही खून केला आहे. याचा अर्थ दहशतवाद्यांनी फक्त निर्दोष व्यक्तींना लक्ष्य केले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की आज 6 तारीख आहे. सहा मे रोजी आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. आता जेव्हा पण पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरच नाव ऐकेल तेव्हा त्यांना हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल. त्यांनी कधी विचारही केला नव्हता की हिंदुस्थान त्यांना घुसून मारेल. हिंदुस्थानच्या या कारवाईमुळे पाकिस्तान आतून हलला आहे आणि त्यांनी जम्मू कश्मीरच्या सामान्य माणसांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तान कशा प्रकारे मंदिर, मशीद आणि शाळांवर गोळीबार करतो हे संपूर्ण जगाने पाहिल्याचे मोदींनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विशाळगडावर सण-उत्सव करण्यास पोलीस प्रशासनाचा मज्जाव, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान विशाळगडावर सण-उत्सव करण्यास पोलीस प्रशासनाचा मज्जाव, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर मलिक रेहान उरूसातील प्राण्यांच्या कुर्बानीसाठी मुंबई हायकोर्टाने, हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर...
ऑगस्ट क्रांती मैदानात नमाजासाठी हवी परवानगी, हायकोर्टात याचिका; सांस्कृतिक विभागाला निर्णय घेण्याचे आदेश
शुभमंगल सावधान! शरण आलेले 13 नक्षलवादी लग्नाच्या बेडीत! मुख्यमंत्री फडणवीस यजमान, पोलीस बनले वऱ्हाडी
नीट पीजीची परीक्षा आता 3 ऑगस्टला होणार
शिंदेंचे विमान उडवण्यास पायलटचा नकार, जळगाव विमानतळावर गोंधळ
महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार! उद्धव ठाकरे म्हणाले, संदेश देणार नाही… बातमीच देतो… शिवसेना-मनसे युतीबाबत थेटच बोलले
जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन