Health Tips- जेवणानंतर मुखवास खाण्याचे अगणित फायदे, वाचा सविस्तर

Health Tips- जेवणानंतर मुखवास खाण्याचे अगणित फायदे, वाचा सविस्तर

मुखवास हा एक पारंपारिक हिंदुस्थानी आहाराचाच एक भाग म्हणायला हवा. मुखवास हा शतकानुशतके जेवणानंतर आपण खात आलोय. विविध बिया, मसाले आणि औषधी वनस्पतींपासून मुखवास बनवला जातो. मुखवास केवळ चवीलाच नाही तर, आरोग्यासाठीही तितकाच उपयुक्त आहे.

जेवणानंतर मुखवासाचे सर्वात महत्वाचे फायदे

मुखवास पचनास मदत करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरते. तसेच मुखवासात आढळणाऱ्या अनेक घटकांमध्ये, जसे की बडीशेप, ओवा, अळशी हे सर्व घटक पोटफुगी, गॅस आणि अपचन कमी करण्यास मदत करतात.

 

जेवणानंतर मुखवास खाण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे, श्वासाला ताजेपणा प्राप्त होतो. मुखवासमुळे आपल्या तोंडाचा दुर्गंध कमी होण्यास मदत होते. विशेषतः, बडीशेपमुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.

 

मुखवास श्वास ताजेतवाने करण्यासोबतच तोंडाचे आरोग्य सुधारण्यासही हातभार लावतो. मुखवासमुळे लाळेचे उत्पादन वाढविण्यास मदत होते. यामुळे तोंडातील आम्लता देखील मोठ्या प्रमाणावर कमी होते.

 

मुखवासमध्ये असलेले तीळ, सुके खोबरे यासारख्या घटकांमुळे हानिकारक जीवाणूंची वाढ रोखण्यास मदत होते. यामुळे हिरड्या आणि दात निरोगी राहतात.

मुखवास हा अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. यामुळे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत होते.

मुखवासातील फायबर पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते, त्यामुळे कमी खाल्ले जाते. मुखवासात असलेले अँटीऑक्सिडंट्स चयापचय वाढवतात, यामुळे जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.

मधुमेह असलेल्या लोकांमध्ये मुखवास रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. मुखवासात असलेले फायबर रक्तप्रवाहात साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता कमी होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विशाळगडावर सण-उत्सव करण्यास पोलीस प्रशासनाचा मज्जाव, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान विशाळगडावर सण-उत्सव करण्यास पोलीस प्रशासनाचा मज्जाव, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर मलिक रेहान उरूसातील प्राण्यांच्या कुर्बानीसाठी मुंबई हायकोर्टाने, हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर...
ऑगस्ट क्रांती मैदानात नमाजासाठी हवी परवानगी, हायकोर्टात याचिका; सांस्कृतिक विभागाला निर्णय घेण्याचे आदेश
शुभमंगल सावधान! शरण आलेले 13 नक्षलवादी लग्नाच्या बेडीत! मुख्यमंत्री फडणवीस यजमान, पोलीस बनले वऱ्हाडी
नीट पीजीची परीक्षा आता 3 ऑगस्टला होणार
शिंदेंचे विमान उडवण्यास पायलटचा नकार, जळगाव विमानतळावर गोंधळ
महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार! उद्धव ठाकरे म्हणाले, संदेश देणार नाही… बातमीच देतो… शिवसेना-मनसे युतीबाबत थेटच बोलले
जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन