कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, देशात आतापर्यंत 4 हजार 866 रुग्ण

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय,  देशात आतापर्यंत 4 हजार 866 रुग्ण

केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 866 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोनाला घाबरू नका, खबरदारी घ्या, असे आवाहन पेंद्रीय आरोग्य विभागाने केले आहे.

देशात जानेवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. केरळमध्ये आतापर्यंत 1 हजार 487 कोरोना रुग्ण सापडले आहेत. केरळपाठोपाठ महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्येही रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

महाराष्ट्रात आज रुग्णसंख्या घटली 

राज्यात बुधवारी एकाच दिवशी 105 कोरोना रुग्ण सापडले होते, तर आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आज रुग्णसंख्येत घट झाली असून दिवसभरात 98 रुग्ण सापडले आहेत. सुदैवाने आज कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत राज्यात 14 हजार 565 चाचण्या झाल्या असून 1 हजार 162 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी सध्या 548 सक्रिय रुग्ण आहेत, तर 597 रुग्ण बरे झाले आहेत. एकटय़ा मुंबईत आतापर्यंत 575 कोरोना रुग्ण सापडले आहेत.

कोरोना आपल्याबरोबरच राहणार – आरोग्यमंत्री 

कोरोना व्हायरसने देशभरात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्यातही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. कोरोना आपल्या सोबतच राहणार आहे. लोकांना पॅनिक होऊ देऊ नका. फक्त योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Buldhana News – पैशांची परतफेड केली तरीही सावकाराचा जाच सुरूच; शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवले Buldhana News – पैशांची परतफेड केली तरीही सावकाराचा जाच सुरूच; शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवले
मलकापुर तालुक्यातील धरणागावातील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी...
समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन
Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?
ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी