भूसंपादनाला संमती देणारे 60 टक्के शेतकरी कोण? पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधितांचा प्रशासनाला जाब

भूसंपादनाला संमती देणारे 60 टक्के शेतकरी कोण? पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधितांचा प्रशासनाला जाब

नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 60 टक्के जमीन मालकांची भूसंपादनाला संमती आहे, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हे जमीन मालक शेतकरी कोण, त्यांची नावे जाहीर करा, असे आव्हान विमानतळ बाधित गावांमधील शेतकऱयांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

विमानतळ बाधित गावांमधून भूसंपादनाच्या विरोधात जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त हरकती जिल्हा प्रशासनाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. असे असताना याच गावांमधून शेतकऱयांची भूसंपादनाला संमती असल्याचे सांगितले जात आहे. एकरी 10 कोटी दर दिल्यास एखतपूर-मुंजवडी गावचे शेतकरी जमीन देण्यास तयार, असे ग्रामसभा घेऊन सांगण्यात आल्याची चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात या गावांमधून 150 पेक्षा जास्त हरकती दाखल आहेत. येथील गावकऱयांनी संमती दिल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

काही एजंट व शासकीय कर्मचारी व सत्ताधारी पक्षाचा एक राजकीय नेता या भागातील शेतकऱयांवर सत्ताधारी राजकीय पक्षाच्या माध्यमातून दबाव आणत आहे. या भागातील जमिनी देण्यासाठी राजकीय पक्षाचे एजंट व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक देखील सक्रिय झाले असून या भागात जमीन खरेदी-विक्रीला बंदी असली तरी नोटरी व खासगीत कोऱया स्टॅम्पवर टोकन (मोबदला) देण्याचे प्रमाण वाढले आहे.

गावकऱयांनी आज निवेदन दिले. पारगाव, खानवडी, पुंभारवळण, उदाचीवाडी व वनपुरी या ग्रामपंचायतींनी कुठल्याही प्रकारचे ठराव दिलेले नसून या सभेमध्ये शेतकऱयांनी भविष्याचा विचार करता जमिनी देणे योग्य नाही. आणि म्हणून जमीन देण्यास विरोध राहील अशाच प्रकारची भूमिका घेतलेली असल्याने कोणताही मोबदला नाही व तशा प्रकारचा ठरावही तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांना दिलेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. परंतु या करंडकाच्या नावात बदल...
Photo किल्ले रायगडावर उत्साहात संपन्न झाला शिवराज्यभिषेक दिन सोहळा
मिंधे गटात जाणे ही फार मोठी चूक, पण आता माझ्या माहेरी परतले; सुजाता शिंगाडे यांचा शिवसेनेत प्रवेश
आरोग्यासाठी ही इवलीशी वेलची ठरते अमृत, तज्ञांनी सांगितले याचे आरोग्यदायी फायदे
केमिकल पद्धतीने पिकवलेले कलिंगड कसे ओळखावे? ‘या’ 5 ट्रिक्स करतील काम
आयुर्वेदानुसार चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन एकत्र करू नयेत, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान