देशात जातनिहाय जनगणना दोन टप्प्यांत होणार; 1 ऑक्टोबर 2026 पासून जम्मू – कश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड

देशात जातनिहाय जनगणना दोन टप्प्यांत होणार; 1 ऑक्टोबर 2026 पासून जम्मू – कश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड

जातनिहाय जनगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. दोन टप्प्यांत ही जनगणना होणार असून, पहिल्या टप्प्यात 1 ऑक्टोबर 2026 पासून हिमालयाच्या कुशीतील राज्यांमध्ये, तर दुसरा टप्पा 1 मार्च 2027 पासून देशभरात राबविण्यात येणार आहे. दरम्यान, या जनगणनेमागे आगामी बिहार आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशात जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह विविध विरोधी पक्षांनी सातत्याने केली होती. तर केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपने जातनिहाय जनगणनेला विरोध केला होता. मात्र काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना घेणार, असे जाहीर केले होते. आज अखेर या जनगणनेला मुहूर्त सापडला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

1931 नंतर पहिल्यांदा जातनिहाय जनगणना

1931 साली ब्रिटिशांनी जातनिहाय जनगणना केली होती. तोच डेटा आजही वापरला जात आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर आता पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार आहे.

कोरोनाचे कारण सांगून मोदी सरकारने टाळाटाळ केली होती

देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जात होती. 2011 मध्ये शेवटची जनगणना झाली होती. ही जनगणना जातनिहाय नव्हती. देशातील लोकांचा आर्थिक व सामाजिक स्तर याची माहिती होती. मात्र, ही आकडेवारी कधी बाहेर आली नाही. 2021 मध्ये जनगणना करणे अपेक्षित होते. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाचे कारण सांगून सुरुवातीला जनगणना पुढे ढकलली. त्यानंतर टाळाटाळ केली होती.

अशी होणार जनगणना

  • दोन टप्प्यांत ही जनगणना होईल. 1 ऑक्टोबर 2026 पासून हिमालयाच्या कुशीतील राज्यांमध्ये बर्फाळ प्रदेशात जम्मू-कश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ही जनगणना सुरू होणार आहे. z 1 मार्च 2027 पासून देशातील इतर सर्व राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरुवात होईल. zजनगणना कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन लोकांची माहिती गोळा करतील. यामध्ये जातीचा एक कॉलम असेल. देशात जातीनिहाय लोकसंख्या जाणून घेणे आणि समाजातील विविध वर्गाची आर्थिक-सामाजिक स्थितीची माहिती मिळवणे हे या जनगणनेचे उद्दिष्ट आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीचे कनेक्शन

जातनिहाय जनगणना घेण्यामागे मोदी सरकारचे विधानसभा निवडणुकीचे कनेक्शन असल्याची चर्चा आहे. बिहार विधानसभा निवडणूक नोव्हेंबर 2025 मध्ये होईल. त्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होईल. जानेवारी 2027 च्या पहिल्या आठवडय़ात निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. निवडणूक काळातच जातनिहाय जनगणना सुरू होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. परंतु या करंडकाच्या नावात बदल...
Photo किल्ले रायगडावर उत्साहात संपन्न झाला शिवराज्यभिषेक दिन सोहळा
मिंधे गटात जाणे ही फार मोठी चूक, पण आता माझ्या माहेरी परतले; सुजाता शिंगाडे यांचा शिवसेनेत प्रवेश
आरोग्यासाठी ही इवलीशी वेलची ठरते अमृत, तज्ञांनी सांगितले याचे आरोग्यदायी फायदे
केमिकल पद्धतीने पिकवलेले कलिंगड कसे ओळखावे? ‘या’ 5 ट्रिक्स करतील काम
आयुर्वेदानुसार चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन एकत्र करू नयेत, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान