डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्याचे तज्ञांनी सांगितले ‘हे’ खास उपाय, असा घ्या आहार

डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्याचे तज्ञांनी सांगितले ‘हे’ खास उपाय, असा घ्या आहार

आई होणे ही एक सुंदर भावना आहे. पण या काळात आणि डिलिव्हरीनंतर महिलेच्या शरीरात तसेच आयुष्यात अनेक बदल होतात. डिलिव्हरीनंतर अनेक महिलांचे वजन वाढते. त्यात गरोदरपणात वाढलेले वजन डिलिव्हरीनंतरही लवकर कमी होत नाही. डिलिव्हरीनंतर वजन कमी कसं करावं हा मोठा प्रश्न स्त्रियांपुढे असतो. काही स्त्रिया तर प्रेग्नेंसीनंतर वाढलेल्या वजनामुळे आपला आत्मविश्वास देखील गमावून बसतात. मात्र स्त्रियांनी असं न करता आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच डिलिव्हरीनंतर स्त्रियांना मुलाची जबाबदारीही असते. त्यामुळे त्या स्त्रियांचा आहार आणि जीवनशैली योग्य असणे महत्वाची असते. यामुळे तुमचं आणि बाळाचं आरोग्य देखील निरोगी राहतं. पण या काळात वजन कमी करताना केलेली एक चूक आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे, डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी योग्य आहार कोणता असेल आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. याबद्दल तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया.

तज्ञ काय सांगतात?

वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुशीला खुटेटा सांगतात की डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम, हे लक्षात ठेवले पाहिजे की वजन कमी करण्यासाठी घाई करू नका, तर हळूहळू आणि सुरक्षितपणे वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आरोग्यावर आणि स्तनपानाच्या क्षमतेवर परिणाम होणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरीनंतर पहिल्या 6 आठवड्यांपर्यंत शरीराला विश्रांती घेण्यासाठी आणि बरे होण्यासाठी वेळ देणे. त्यानंतर, हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, डाळी, दही, अंडी, चीज आणि पुरेसे पाणी यासारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे सुरू करणे. तळलेले, गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी सेवन करा.

दिवसातून 5 ते 6 वेळा कमी प्रमाणात जेवा जेणेकरून शरीराला सतत ऊर्जा मिळेल. स्तनपानामुळे कॅलरीज बर्न होतात म्हणून वजन कमी होण्यास देखील मदत होते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर चालणे, योगा किंवा स्ट्रेचिंगसारखे हलके व्यायाम करा. कोकून हॉस्पिटलमधील तज्ञ सांगतात की डिलिव्हरीनंतर स्त्रियांनी पुरेशी झोप घेतली पाहिजे, जरी नवजात बाळ असल्याने काहींची झोप पूर्ण होणे थोडे कठीण असू शकते, परंतु शक्य तितकी विश्रांती घ्या. परंतु या काळात विश्रांती घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील आणि नैराश्य किंवा मनोविकार सारख्या समस्या टाळता येतील.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवसांमध्ये सतत वजन कमी कस होईल याचा विचार करू नये प्रत्येक महिलेचे शरीर वेगळे असते आणि वजन कमी करण्यास वेळ लागू शकतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहारात बदल करा आणि खा. यामुळे स्त्री आणि मूल दोघेही निरोगी राहतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, कोका कोलाविरुद्ध अजगणी येथे मूक मोर्चा भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, कोका कोलाविरुद्ध अजगणी येथे मूक मोर्चा
अजगणी येथील विस्तारित लोटे वसाहतीमधील 88 एकर जमिनीवर होत असलेल्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ...
जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे आज उद्घाटन
धक्कादायक! सांडपाणी प्रक्रिया प्लाण्टमध्ये कोरोना विषाणूचे जनुकीय अंश, एनसीएलच्या तपासातून माहिती समोर
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, देशात आतापर्यंत 4 हजार 866 रुग्ण
भाजपच्या ‘संकल्प’पत्राचा शिवसेनेकडून पंचनामा, शिवसैनिकांच्या प्रश्नावर मंत्री अतुल सावे निरुत्तर
पोलिसांनी वाचवले वृद्ध डॉक्टरचे 1 कोटी 29 लाख रुपये
युक्रेनच्या ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ला रशियाचा करारा जवाब; बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव, ड्रोन हल्ल्यांनी केलं बेजार