फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा नको, आकडेवारी दाखवत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा नको, आकडेवारी दाखवत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

दुचाकी, चारचाकी विक्रीत घट झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा असेलेली अर्थव्यवस्था आपल्याला नको असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, आकडे खरं बोलतात. दुचाकीची विक्री 17 टक्क्यांनी तर चारचाकींची विक्री 8.6 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर मोबाईल विक्री 7 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर दुसरीकडे खर्च आणि कर्ज दोन्ही वाढले आहेत. घराचं भाडं, घरखर्च, शिक्षणाचा खर्च जवळपास सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत.

तसेच ही फक्त आकडेवारी नाही तर त्या आर्थिक दबावाची सत्यता आहे ज्याच्याखाली प्रत्येक सामान्य माणूस पिचला जातोय. आम्हाला असे राजकारण हवे आहे ज्यात कुठल्याही प्रकारची इव्हेंटबाजी नको. ज्यात सर्मसामान्यांशी निगडीत प्रश्न हवेत, जिथे योग्य प्रश्न विचारले जातील, परिस्थती समजून घेतली जाईल आणि जबाबदारीने उत्तर दिले जाईल. आम्हाला अशी अर्थव्यवस्था नकोय ज्यात फक्त निवडक उद्योजकांचा फायदा होईल आम्हाला अशी अर्थव्यवस्था हवी आहे ज्याचा फायदा प्रत्येत भारतीयाला होईल असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाही, पण याचा अर्थ समलिंगी लोक कुटुंब बनवू शकत नाहीत, असा होत नाही. समलिंगी लोक...
शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन
Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?
ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी
Ratnagiri News – रत्नागिरीत पोलिसांची धडक कारवाई; एकीकडे पाच बैलांची सुटका, दुसरीकडे गांजा जप्त