शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला शिवसेनेनं विचारला जाब, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मराठवाडा विभागाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा? हे आंदोलन गुरुवारपासून सुरू करण्यात आले आहे. या जनआंदोलन अंतर्गत आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्फत राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन दिले. अंबादास दानवे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली.
सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकऱ्यांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलनात करण्यात येत आहे. 5 जून ते 12 जून या कालावधीत संपूर्ण मराठवाड्यात हे आंदोलन असणार असल्याची माहिती यावेळी दानवे यांनी दिली.
याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले व मीना फसाटे उपस्थित होते.
शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मराठवाडा विभागाच्या वतीने “क्या हुआ तेरा वादा? हे आंदोलन आजपासून सुरु करण्यात आले आहे. या जनआंदोलन अंतर्गत आज माझ्या नेतृत्वात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांच्या मार्फत राज्य शासनाचे प्रतिनिधी… pic.twitter.com/l4wzZwiizt
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 5, 2025
असे होणार आंदोलन…
5 जून – जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांना निवेदन.
6, 7 जून – सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार यांना पारंपारिक वाद्यांच्या गजरात ‘क्या हुआ तेरा वादा? असा सवाल करून निवेदन.
8, 9, 10 जून – शिवसेना पदाधिकारी दररोज पाच गावात बैठका घेऊन शेतकर्यांशी संवाद साधणार, सरकारने केलेल्या फसवणुकीची माहिती देणार…
11 जून – तालुक्याच्या ठिकाणी बैलगाडी, टॅ्रक्टर मोर्चा
12 जून – जिल्हास्तरीय ‘चक्का जाम’ आंदोलन
महायुती सरकारने केलेले वादे
– शेतकर्यांना कर्जमुक्त करणार, शेतकरी सन्मान योजनेतून 15 हजार रुपये देणार.
– लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार.
– 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते.
– खतांवर एसजीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करणार.
– वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये देणार.
– शेतीला 24 तास वीज देणार.
– शेतमालाला हमीभाव देणार.
– बी, बियाणांच्या किंमती नियंत्रणात ठेवणार.
-हर घर जल, हर घर छत.
– मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता मिळवणार.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List