95 वर्षांचा वर अन् 90 वर्षांची वधू; आधी लिव्ह-इनमध्ये राहिले मग 70 वर्षांनी बांधली लग्नगाठ

95 वर्षांचा वर अन् 90 वर्षांची वधू; आधी लिव्ह-इनमध्ये राहिले मग 70 वर्षांनी बांधली लग्नगाठ

देशात लिव्ह-इन-रिलेशनशिपच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने 18 ते 40 वयोगटातील लोकांचा समावेश असतो. एखादे लिव्ह इन रिलेशनमध्ये जास्तीत जास्त 5 ते 7 वर्षे राहते. मात्र, तब्बल 70 वर्षे लिव्ह इनमध्ये राहणारे कपल तुम्हाला माहित आहे का? होय राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यातील एक लिव्ह इन कपल सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यातील गलांदर गावात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. येथे 95 वर्षीय रामा भाई अंगारी आणि 90 वर्षीय जीवाली देवी यांनी 70 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आता लग्न केले आहे. हे वृद्ध जोडपे गेली 70 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना चार मुले आणि दोन मुली, एकूण आठ मुले आहेत.

एवढी वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर या जोडप्याला लग्न करण्याचे होते. यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मुलांनीही संमत्ती दर्शवली. यानंतर संपूर्णँ गावात लग्नाचे आमंत्रण देण्यात आहे. आणि लग्न समारंभाची सुरूवात झाली. या वृद्ध कपलच्या मुलांनी देखील लग्नात कोणतीच कमतरता भासू दिली नाही. अगदी रितीपरंपरेनुसार हळद, मेहंदी, असे सर्व विधी पार पडले.

दरम्यान या वृद्ध जोडप्याच्या लग्न समारंभाला गावातील हजारो लोक उपस्थित होते. रामा भाई आणि जिवली देवी यांनी सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोठा मुलगा बाकू अंगारी शेतकरी आहे. शिवराम आणि कांतिलाल सरकारी शाळेत शिक्षक आहेत. चौथा मुलगा लक्ष्मण देखील शेतकरी आहे. मुलगी सुनीता शिक्षिका आहे आणि अनिता परिचारिका आहे. चार मुले सरकारी नोकरीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाही, पण याचा अर्थ समलिंगी लोक कुटुंब बनवू शकत नाहीत, असा होत नाही. समलिंगी लोक...
शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन
Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?
ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी
Ratnagiri News – रत्नागिरीत पोलिसांची धडक कारवाई; एकीकडे पाच बैलांची सुटका, दुसरीकडे गांजा जप्त