मणिपूर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरात पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, 12 हजारांहून अधिक कुटुंबांना फटका

मणिपूर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरात पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, 12 हजारांहून अधिक कुटुंबांना फटका

देशातील वेगवेगळ्या भागांत पावसाचे जोरदार आगमन झाले असून, पूर्वोत्तर राज्यांत पावसाने अक्षरशः कहर केला आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मणिपूर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरात आतापर्यंत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पाऊस, भूस्खलन आणि पूर याचा पाच जिल्ह्यांतील 12 हजारांहून अधिक कुटुंबांना फटका बसला आहे. पावसात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.

मिझोरामच्या लाँगतलाई शहरात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे पाच घरे आणि हॉटेल कोसळले. यात अनेक नागरिक अडकले आहेत. लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एसआरडीएफ यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. भूस्खलनामुळे राष्ट्रीय राजमार्ग 54 बंद करण्यात आला आहे. तसेच गेल्या 24 तासांत मिझोरम, त्रिपुरा आणि मेघालयात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाममधील 17 जिल्ह्यात पूरस्थिती असून भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. आसामध्ये 78 हजारांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले असून जवळपास 1200 जणांनी 5 वेगवेगळ्या मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. आसामध्ये लखीमपूर जिल्ह्यात पुराचा कहर दिसून येत आहे. तसेच आसाममधील कामरूप मेट्रो जिल्ह्यात 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत गुवाहाटी आणि आजूबाजूच्या परिसरात 90 ते 134 मिमी पाऊस झाला आहे. गुवाहाटीमध्ये भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली. यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच गोलाघाट आणि लखीमपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला.

चीनच्या सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशातील मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्यात वाहन वाहून गेल्याने 7 जणांचा मृत्यू झाला, दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर मणिपूरमध्येही तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचले असून अधिकाऱ्यांनी पुराचा इशारा जारी करत नदीकिनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने येत्या काही दिवसांमध्ये पूर्वोत्तर राज्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच आसाममधील काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दल सतर्क असून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. पावसामुळे शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ, आता या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ, आता या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजात जायचे वेध लागले आहेत. त्यासाठी कॉलेज निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे. आधी इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश...
अक्षय कुमारने ‘या’ कारणामुळे चाहत्यांसमोर जोडले हात, हाऊसफुल 5 च्या प्रमोशनचा व्हिडिओ व्हायरल
NEET PG 2025 – नीट पीजी परीक्षा पुढे ढककली, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर एनबीईएमएसचा निर्णय
हिंदुस्थानने दोन हजार बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवले, BSF ची मोठी कारवाई
मोठी बातमी! आशिया चषक अनिश्चित काळासाठी स्थगित, कारणही आलं समोर; वाचा…
Pune News: सराफी पेढीतून तब्बल साडेचार कोटींच्या दागिन्यांची चोरी, विश्रामबाग पोलिसांकडून कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
आम्ही इथले भाई, रामटेकडीत टोळक्याचा राडा, हवेत शस्त्रास्त्रे फिरवित केली दगडफेक