Pune News – एकीकडे पावसाने झोडपलं, दुसरीकडे कांदा बराकीला आग लावली; शेतकऱ्याच मोठं नुकसान
मे महिन्यातच पुण्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने शतेकऱ्यांची अवस्था आधीच दयनीय झाली आहे. माल खराब झाल्याने त्याचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अशातच आता आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे अज्ञात व्यक्तीने एका शेतकऱ्याचा कांद्याच्या बराकीला आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे त्यांचे लाखभर रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप बबन धुमाळ धुमाळ असे नुकसानग्रस्थ शेतकऱ्याचे नाव आहे. कांद्याला बाजारभाव नसल्याने त्यांनी आपला कांदा बराकीमध्ये साचून ठेवला होता. बराखीमध्ये जवळपास 600 पिशवी कांद्याची साठवणूक केली होती. शनिवारी दुपारी (31 मे 2025) दीडच्या सुमारास कांद्याच्या बराखीला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर संदीप धुमाळ व इतर शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रन मिळवेपर्यंत 600 पैकी सुमारे 100 गोणी कांदा जळून गेला. 500 पिशव्या कांदा वाचविण्यात त्यांना यश आले आहे. या घटनेत धुमाळ यांचे सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पेट्रोलची रिकामी बाटली सापडल्याने या संदर्भात अज्ञात व्यक्तीवर पारगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List