आधी तुमचं काय जळतंय ते पहा… जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावलं, उत्तर ऐकून म्हणाल…

आधी तुमचं काय जळतंय ते पहा… जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावलं, उत्तर ऐकून म्हणाल…

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारातने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमधील काही दहशतवादी तळांना लक्ष्य करत ते उद्ध्वस्त केले. त्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. मात्र भारताच्या या कारवाईमुळे पाकचा जळफळाट झाला असून तेथील अनेक सेलिब्रिटींनीही भारताविरुद्ध गरळ ओकली. त्याच दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी हिने नुकतीच भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित करून जावेद अख्तर यांच्यावर टीका केली. मुस्लिम असलेल्या जावेद अख्तर यांना हिंदू लोक घरही देत ​​नाहीत, अशी खालच्या थराची टीका त्यांनी केली. त्यामुळे भारत-पाक तणावादरम्यान त्यांनी ( जावेद अख्तर) नसीरुद्दीन शाह यांच्यासारखं गप्प राहिलं पाहिजे आणि याविषयावर काहीही टिप्पणी करू नये, अशी मुक्ताफळं तिने उधळली.

मात्र तिच्या या टीकेनंतर जावेद अख्तर यांनीही पाकिस्तानी अभिनेत्रीला थेट सुनावलं. मुस्लिमांना भारतात घरं मिळत नाही, त्यामागचं खरं कारण म्हणजे पाकिस्तान आणि पाकिस्तानी आहेत, असं परखड उत्तर त्यांनी दिलं. लल्लनटॉपशी बोलताना, जावेद अख्तर यांनी बुशरा अन्सारी यांच्या ‘मुस्लिमांना घरे मिळत नाहीत’ या टिप्पणीवर उत्तर दिले.’मी कधी बोलावं आणि कधी बोलू नये हे मला सांगणारी कोण?’ असा थेट सवालही त्यांनी विचारला. मी कधी बोलावं आणि कधी बोलू नये हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला (बुशरा अन्सारी) कोणी दिला? असं म्हणत त्यांनी बुशरा यांना बरंच सुनावलं.

मुस्लिम असल्यामुळे शबाना आझमी यांना मिळालं नव्हतं घर

पाकिस्तानी अभिनेत्रीच्या टिप्पणीवर जावेद अख्तर यांनी आपली बाजू मांडली. सुमारे 25 वर्षांपूर्वी त्यांची पत्नी शबाना आझमी यांना मुंबईत घर खरेदी करायचे होते. मात्र ब्रोकरने त्याना साफ सांगितलं की, घरमालक मुस्लिमांना घरे देत नाहीत, म्हणूनच शबाना यांना घर मिळालं नाही.घरमालकाने शबाना आझमींकडे माणूस म्हणून नव्हे तर मुस्लिम म्हणून पाहिलं हे दुर्दैवी होते, परंतु त्यांच्या निर्णयामागे एक अतिशय भावनिक कारण होते, असंही जावेद अख्तर म्हणाले.

पाकिस्तानमुळे लोकांच्या मनात कडवटपणा

‘ त्या मालकाने फ्लॅट विकण्यास नकार दिला कारण त्याचे पालक पाकिस्तानातील सिंधचे होते आणि त्यांना एका रात्रीत त्यांचा देश सोडून पळून जावे लागले. त्यांना बाहेर फेकण्यात आले. त्यांची जमीन, मालमत्ता, सामाजिक आदर, व्यवसाय, सर्वकाही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. तो (घरमालक) निर्वासित म्हणून भारतात आला. त्याच्या मनात अजूनही ती वेदना होती; तो ते दुःख, ती कटुता विसरू शकला नव्हता.’ असं जावेद अख्तर यांन नमूद केलं.

पाकिस्तानमुळे सिंधी लोकांना सोडावा लागला आपला देश

जावेद अख्तर पुढे म्हणाले की, फाळणीनंतर पाकिस्तानातून पळून गेलेल्या अनेक सिंधी हिंदूंना त्यांचे जीवन पुन्हा सुरू करावे लागले. ‘हे तेच सिंधी आहेत, गरीब सिंधी, जे रस्त्यावर कपडे आणि चणे विकत असत. त्यांनी आपल्या मेहनतीने स्वतःचे स्थान निर्माण केले. पण त्यांचे काय झाले? ती कटुता अजूनही त्यांच्या आत जिवंत आहे ‘असंही अख्तर यांनी सांगितलं.

पाकिस्तानी लोकांनी सिंधी लोकांना एका रात्रीत त्यांच्या देशातून हाकलून लावले, त्यानंतर त्यांना भारतात निर्वासित म्हणून राहावे लागले आणि निर्वासितांचे जीवन खूप वेदनादायक होते. त्यांन लाखो लोकांसोबत छावणीत राहावे लागले आणि जेवणासाठीही लांबंच लांब रांगेत उभं राहावं लागायचे, असे ते म्हणाले.

जावेद अख्तर यांनी बुशरा अन्सारीला शिकवला धडा

ज्यांच्यावर इतक्या खोल जखमा आहेत ते मुंबईच्या त्या घरमालकासारखीच प्रतिक्रिया देतील ना. ज्यांनी त्या लोकांवर हे घाव घातले ते दुसरे तिसरे कोणी नव्हेत,पाकिस्तानीच आहेत. जर शबाना आझमींना भारतात घर मिळत नसेल तर त्यामागचं कारण म्हणजे, पाकिस्तान आणि पाकिस्तानींनी दिलेल्या जखमा असल्याचं अख्तर यांनी सुनावलं. पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी या ज्यांच्यावर घर न देण्याचा आरोप करत आहे, त्या लोकांना पाकिस्ताननेच दुखावलं आहे. म्हणून, कोणाकडेही बोट दाखवण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या आत डोकावून पाहिले पाहिजे,
असा सल्ला त्यांनी दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता होणार धारावीचा पुनर्विकास; असा बदलणार चेहरामोहरा आता होणार धारावीचा पुनर्विकास; असा बदलणार चेहरामोहरा
मुंबईच्या मध्यभागी तब्बल 600 एकरवर धारावी पसरली आहे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) मास्टर प्लॅनला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा...
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढला, आज एवढ्या रुग्णांची नोंद
‘अजित पवार तुमचा माणूस…’, लक्ष्मण हाकेंचा पुन्हा अमोल मिटकरींवर घणाघात
vastu tips: वास्तूनुसार तुमच्या स्वयंपाकघर ‘या’ रंगांनी सजवा, घरातील सदस्य राहातील हेल्दी….
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक सिंहस्थ कुंभमेळाच्या पर्वणी जाहीर, जाणून घ्या अमृतस्नानाच्या तारखा
दुर्गराज रायगडावर सापडले प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र; खगोलशास्त्रीय अभ्यासाचा महत्त्वपूर्ण पुरावा
Mumbai News – मुंबई विमानतळावर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश, एका प्रवाशाला अटक