या अभिनेत्रीने केली पहलगामच्या तुरुंगात शूटिंग; खऱ्या गुन्हेगारांमध्येही वावरली बिनधास्त

या अभिनेत्रीने केली पहलगामच्या तुरुंगात शूटिंग; खऱ्या गुन्हेगारांमध्येही वावरली बिनधास्त

बॉलिवूडमध्ये 90s मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्याबद्दल आजही त्याच कौतुकाने बोललं जातं. त्यापैकी एक अभिनेत्री अशी होती जिच्या अभिनयाबद्दल आणि सौंदर्याबद्दल आजही बोललं जातं. तिने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. एवढंच नाही तर तिने चक्क पहलगामच्या तुरुंगात शूटिंग करत तेथील खऱ्या गुन्हेगारांमध्येही वावरताना मनात भीती बाळगली नाही.

अभिनेत्रीने केलं होतं पहलगामच्या तुरुंगात शूटिंग 

ती अभिनेत्री म्हणजे सर्वांच्या मनात आजही तिचं स्थान कायम ठेवणारी दिव्या भारती. दिव्या भारतीच्या चित्रपटांबद्दल,तिच्या बिनधास्त वागण्याबद्दल आजही तेवढ्याच कौतुकाने बोललं जातं. ही पहिली अशी अभिनेत्री होती जिने पहलगामच्या तुरुंगात शूटिंग करत खऱ्या गुन्हेगारांमध्ये ती वावरली होती. हा चित्रपट होता मोहरा. ज्यामध्ये दिव्या भारतीसोबत सुनील शेट्टी होते.

सुनील शेट्टी यांची अॅक्शन चित्रपट ‘मोहरा’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा चित्रपट ठरला. या चित्रपटात दिव्या भारती यांना सुनील शेट्टी यांच्यासोबत मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या अकस्मात निधनानंतर रवीना टंडन यांनी ही मुख्य भूमिका साकारली. नुकत्याच एका मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी दिव्या भारती यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आणि तिने निडर स्वभावाचं कौतुक केलं.

पहलगामच्या तुरुंगात केलेल्या शुटींगचा अनुभव 

पहलगामच्या तुरुंगात दिव्यासोबत केलेल्या शुटींगचा अनुभव सांगितला. सुनील शेट्टी म्हणाले, “आम्ही पहलगामच्या तुरुंगात शूटिंग केलं, पण ती मुलगी अगदी निडर होती. तुरुंगात खरे गुन्हेगार होते, तरीही तिला अजिबात भीती वाटली नाही. ती आयुष्याची नेहमी मजा घेत जगायची. आम्ही नेहमीच प्लान करायचो की राजीवला कसं चिडवायचं, शब्बीरला कसं त्रास द्यायचा, लोकांना कसं हसवायचं आणि वातावरण कसं हलकं-फुलकं ठेवायचं. तिच्यासोबत काम करणं म्हणजे स्वप्नवत अनुभव होता.”

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतीय अभिनेत्रींपैकी एक 

सुनील शेट्टी यांनी बॉलिवूडमध्ये ‘बलवान’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं, ज्यामध्ये दिव्या भारती याही होत्या. राजीव राय यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘मोहरा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. या चित्रपटात अक्षय कुमार, नसीरुद्दीन शाह, रवीना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारल्या, तर पूनम झावर, रझा मुराद, परेश रावल, गुलशन ग्रोवर आणि सदाशिव अमरापुरकर यांनी सहाय्यक भूमिका निभावल्या.

दिव्या भारती आपल्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतीय अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी ‘बॉबिली राजा’, ‘राउडी अल्लुडु’, ‘शोला और शबनम’, ‘दीवाना’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी, मुंबईतील अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील त्यांच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडल्यानंतर त्यांचा कूपर रुग्णालयात मृत्यू झाला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पालघरमध्ये रासायनिक कारखान्यात गॅस गळती, दहा कामगारांची प्रकृती बिघडली पालघरमध्ये रासायनिक कारखान्यात गॅस गळती, दहा कामगारांची प्रकृती बिघडली
पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रासायनिक कारखान्यामध्ये निष्काळजीमुळे गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या...
‘संजय राऊत काय स्वातंत्र्य लढा लढून जेलमध्ये गेले नव्हते’, रावसाहेब दानवेंनी पुस्तकावरून डिवचलं
प्रसिद्ध अभिनेत्रीला खूनाच्या आरोपाखाली विमानतळावरच अटक, वाचा सविस्तर
मी तिला किस…; जीनत अमानसोबत रोमांस करण्यास नकार, पण या अभिनेत्रीसाठी मोडल्या इंटिमेसीच्या मर्यादा
इस्रायलचा गाझावर सर्वात मोठा हवाई हल्ला, 125 जणांचा मृत्यू
IPL 2025 – पंजाबचा किंग्जचा दबदबा कायम, अटीतटीच्या लढतीत राजस्थानचा पराभव
लश्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा पाकिस्तानात खात्मा, हिंदुस्थानातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा होता सूत्रधार