देशभरातील बँक खात्यांतून 36 हजार कोटी लंपास, आरबीआयच्या वार्षिक अहवालातून धक्कादायक माहिती उघड

देशभरातील बँक खात्यांतून 36 हजार कोटी लंपास, आरबीआयच्या वार्षिक अहवालातून धक्कादायक माहिती उघड

सध्या बँकेतील पैसा सुरक्षित ठेवणे अवघड झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्कॅमर्स वेगवेगळे फंडे वापरून बँक खात्यातील पैसे काढून घेत आहेत. देशात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बँक फ्रॉडच्या 23,953 घटना घडल्या असून यातून स्कॅमर्सने तब्बल 36,014 कोटी रुपये लंपास केले आहे, अशी धक्कादायक माहिती आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात दिली आहे. देशात बँकेतील खातेदारांची आर्थिक फसवणूक प्रकरणात घसरण झाली असली तरी यातील पैशांची रक्कम लंपास होण्याचे प्रमाण मात्र तीन पटीने वाढले आहे, असे आरबीआयच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

आर्थिक वर्ष 2025 च्या तुलनेत 2024 मधील घटना 34 टक्के कमी आहेत. आरबीआयकडून अहवालात करण्यात आलेला डेटा 1 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या स्कॅमसाठी आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये खासगी सेक्टरच्या बँकेत आर्थिक फसवणुकीचे सर्वात जास्त 14,233 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही बँकिंग सेक्टरमधील प्रकरणातील 59.4 टक्केवारी आहे. सरकारी बँकेत 6935 प्रकरणे म्हणजेच जवळपास 29 टक्के आर्थिक फसवणूक गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. परंतु यातील रक्कम 25,667 कोटी म्हणजेच एकूण 71.3 टक्के आहे. तर खासगी सेक्टर बँकांनी 10,088 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद केली आहे.

नोटा छापणे झाले महाग

नोटा छपाईसाठी करण्यात येणाऱ्या खर्चात 25 टक्के वाढ झाली आहे, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2025 दरम्यान नोटांच्या प्रिंटिंगवर करण्यात आलेला एकूण खर्च 6,372.8 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी हा खर्च 5,101.4 कोटी रुपये होता. आरबीआय आता 2 रुपये, 5 रुपये आणि दोन हजार रुपयाच्या नोटा छापत नाही. 2024-25 या काळात 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये आणि 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा कमी प्रमाणात आढळल्या आहेत. तर 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये वाढ झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pratap Sarnaik : हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालीय, प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याने वादाची ठिणगी Pratap Sarnaik : हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालीय, प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याने वादाची ठिणगी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत राहायचे म्हणून मराठी शिकणे गरजेचे नसल्याचा जावाई शोध लावला होता. त्या...
ना सौंदर्य, ना बुद्धिमत्ता… 1951 मध्ये फक्त बिकिनीवर ठरली पहिली मिस वर्ल्ड; असा बदलला संपूर्ण कॉन्सेप्ट!
‘मी शाहरुखच्या थोबाडीत मारलं अन् सेटवर शांतता पसरली’, अभिनेत्रीने सांगितला शुटींगचा किस्सा
थकवा आणि ताप, बॉलिवूडचा ‘सीरियल किसर’ इमरान हाश्मी पडला आजारी; काही दिवसांसाठी शुटींग थांबवली
Mumbai news – बोरिवलीत कार पार्किंग लिफ्ट कोसळून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग, दोन आरोपींना 6 महिन्याचा तुरुंगवास
सोनाली बेंद्रेचे आलिशान घर, आतून खूपच सुंदर; काळ्या रंगाच्या भिंतीपासून ते चांदीचं देवघर सगळंच युनिक