रेशनच्या 400 पोती तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त; जामखेड-करमाळा मार्गावर छापा

रेशनच्या 400 पोती तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त; जामखेड-करमाळा मार्गावर छापा

रेशनिंगचा तांदूळ काळय़ा बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ट्रकमधून 400 गोण्या तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुंदर बबन घुमरे (वय 60, रा. लोणी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), योगेश मोहन भंडारी (रा. जामखेड, ता. जामखेड (फरार) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

पोलीस निरीक्षक आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने जामखेड-करमाळा मार्गावर सापळा रचून ट्रकवर कारवाई केली. या ट्रकमध्ये पोलिसांना रेशनच्या तांदळाची 400 पोती आढळली. हा तांदूळ काळय़ा बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता. यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. त्याने गुह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तांदळाची पोती आणि ट्रक, असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चालकाविरोधात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, विश्वास बेरड, बिरप्पा करमल, हृदय घोडके, रोहित मिसाळ व भगवान धुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Benefits Of Pickle – चमचाभर लोणचे खा आणि निरोगी राहा, वाचा Benefits Of Pickle – चमचाभर लोणचे खा आणि निरोगी राहा, वाचा
आपल्या आहारामध्ये काही पदार्थांचं महत्त्व हे अबाधित आहे. रोजच्या ताटात चमचाभर लोणचे खाण्याचे असंख्य फायदे आहेत. आपल्या आहारात लोणचं खाण्याचा...
मला अजूनही तुझ्यावर विश्वास; परत ट्रॅकवर ये! सचिन तेंडुलकरचे शब्द देताहेत पृथ्वी शॉला कमबॅकचं बळ
हातचलाखी लपत नसते श्रीमान सीएम जी! वीजदर कमी करण्याची घोषणा फसवी; अंबादास दानवे यांनी केली पोलखोल
Skin Care – सुंदर दिसण्यासाठी फक्त याच तेलाचा वापर करा, वाचा
भाटकरवाड्यात मध्यरात्री तीन दुचाकी जाळल्या; रत्नागिरीत खळबळ
सकाळी फक्त 10 मिनिटे असे चालण्यामुळे आरोग्यासाठी होतील खूप सारे फायदे, वाचा
महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या आणि भाषेच्या लढ्याचे नेतृत्व ठाकरेच करतील; संजय राऊत यांचा विश्वास