दुष्काळी जनतेला पाण्यासाठी लढा अद्याप थांबलेला नाही; शेटफळेतील पाणी संघर्ष परिषदेत नव्या लढ्याचा निर्धार

दुष्काळी जनतेला पाण्यासाठी लढा अद्याप थांबलेला नाही; शेटफळेतील पाणी संघर्ष परिषदेत नव्या लढ्याचा निर्धार

दुष्काळी जनतेला पाणी देण्यासाठी तीन दशके अखंड चालणारी पाणी संघर्ष चळवळ शेवटच्या घटकाला पाणी दिल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा देत शेटफळे (ता. आटपाडी) येथे 33व्या पाणी संघर्ष परिषदेत टेंभू योजनेला ‘पद्मभूषण डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी’ यांचे नाव देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. ही परिषद फक्त ठरावापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती पुढील संघर्षाचे रणशिंग फुंकणारी ठरली. प्रा. शिवाजीराव काळुंगे अध्यक्षस्थानी होते, तर चळवळीचे संयोजक वैभव नायकवडी यांनी लढय़ाच्या पुढील टप्प्याचे संकेत दिले.

शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार वैभव नायकवडी यांनी केला. योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेला विलंब, निधीअभावी रखडलेली कामे आणि अजूनही पाण्यापासून वंचित असलेल्या गावांचा उल्लेख करत त्यांनी लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. प्रा. काळुंगे म्हणाले, डॉ. नायकवडी यांनी स्वतःच्या बागायतीचा पाण्याचा हक्क सोडून तेरा तालुक्यांसाठी संघर्ष केला. टेंभू योजनेला त्यांचे नाव देणे, ही त्यांच्या कार्याची कृतज्ञतेने झालेली नोंद असेल.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष झाला आहे. टेंभू योजनेचे मागील आवर्तन उशिरा आले, शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता म्हणून या लढय़ाला साथ देणारच, असा निर्धार व्यक्त केला. या परिषदेत 20 महत्त्वाचे ठराव संमत झाले असून, ते शासन दरबारी सादर होणार आहेत. यावेळी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, डॉ. सयाजीराजे मोकाशी, बाळासाहेब नायकवडी, सुभाष पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, गौरव नायकवडी, आनंदराव पाटील, विष्णुपंत पाटील, चंद्रकांत गायकवाड, पतंगराव गायकवाड, सावंता पुसावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळाचा जन्म दाखला आता डिस्चार्जपूर्वीच मिळणार, केंद्राचे राज्यांना आदेश जारी बाळाचा जन्म दाखला आता डिस्चार्जपूर्वीच मिळणार, केंद्राचे राज्यांना आदेश जारी
सरकारने सर्वसामान्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रजिस्ट्रार कार्यालयाने सर्व राज्यांना नवजात बालकांच्या मातांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी बाळाचा जन्म प्रमाणपत्र...
Beed Crime – क्लासेसमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार, घटनेने बीडमध्ये खळबळ; दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल, आरोपी फरार
संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची तीन एकर जमीन भेट! आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 गाड्या डिझेल ऐवजी पाणी भरून आल्या! नेमकं काय घडलं?
पुन्हा गलवान नको! राजनाथ सिंह यांनी चीनला सुचवला 4 कलमी फॉर्म्युला
इराणचा इस्रायल, अमेरिकेला चकवा! कोणालाच थांगपत्ता लागला नाही अन् गुप्त अण्वस्त्र तळ तयार झाला
गजराज बिथरला! अहमदाबादच्या जगन्नाथ रथयात्रेत हत्तींचा थरार, भाविकांची पळापळ