फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडालीय, शरद पवारांचा चिमटा
‘फडणवीसांनी दिलेल्या धमकीमुळे आमची झोप उडालीय. आता आमचं कसं व्हायचं!’ असा चिमटा आज शरद पवार यांनी काढला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध कराल तर याद राखा’, अशी धमकी विरोधकांना नुकतीच दिली होती. या वक्तव्याचा शरद पवार यांनी समाचार घेतला. शक्तिपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. या महामार्गाची आवश्यकता आहे का? यासाठी कोल्हापूरच्या लोकांसोबत मी बोलणार आहे. त्यानंतर सरकारचे म्हणणेही आम्ही समजून घेऊ, असेही शरद पवार म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List