पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरवातीची लक्षणे काय असतात? वेळीच ओळखा अन्यथा प्राणघातक ठरू शकेल

पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरवातीची लक्षणे काय असतात? वेळीच ओळखा अन्यथा प्राणघातक ठरू शकेल

कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार असू शकतो. त्याचबरोबर दरवर्षी कर्करोगाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येते. हेल्थी न खाणे आणि धावपळीची जीवनशैली यामुळे लोकांमध्ये कर्करोगाचा धोका अनेकदा वाढताना दिसत आहे. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे, पोटाच्या कर्करोगाची समस्या देखील लोकांमध्ये वेगाने दिसून येत आहे. पोटाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे आणि सहसा हा कर्करोग खूप उशिरा किंवा शेवटच्या टप्प्यात लक्षात येतो. पोटाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. त्यामुळे अशी काही सुरुवातीची लक्षणे जाणून घेऊयात ज्यामुळे कॅन्सरचा धोका लक्षात येऊन वेळीच सावध होता येईल.

सुरुवातीचे लक्षणे:

पोटात सतत जळजळ आणि अपचन

सुरुवातीला पोटाच्या कर्करोगाने पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. परंतु पोटाची सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अपचन, आम्लता किंवा पोटात जळजळ असू शकतात. जर अशी समस्या दीर्घकाळ राहिली तर ती चिंतेचे कारण असू शकते. अशा परिस्थितीत, अन्न खाल्ल्यानंतर जडपणा किंवा पोटफुगी यासारखी लक्षणे दिसू शकतात.

खाण्याची इच्छा न होणे आणि लवकर पोट भरणे

जर थोडेसे खाल्ल्यानंतर तुमचे पोट भरल्यासारखे किंवा तुम्हाला भूक कमी वाटू लागली तर हे सामान्य नाही. जर हे बराच काळ होत असेल तर ते पोटाच्या आतील थरावर तयार झालेल्या ट्यूमरमुळे ते असू शकते. अशा परिस्थितीत, खाण्याची इच्छा कमी होते आणि पोट लवकर भरते.

वजन कमी होणे

अचानक वजन कमी होणे हे देखील पोटाच्या कर्करोगाचे कारण असू शकते. जर कोणत्याही डाएटिंग किंवा वर्कआउटशिवाय वजन कमी होताना दिसत असेल तर ते पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. कर्करोगाच्या पेशी वाढल्यामुळे शरीरातील चयापचय मंदावते. अशा परिस्थितीत 1 ते 2 महिन्यांत वजन मोठ्या प्रमाणात कमी होते. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मळमळ आणि उलट्या

पोटाच्या कर्करोगाच्या रुग्णांना अनेकदा मळमळ आणि उलट्या होतात, विशेषतः खाल्ल्यानंतर. हे पोटाच्या पृष्ठभागावरील बदलांमुळे असू शकते.

डिस्क्लेमर: वरील माहिती ही उपलब्ध स्त्रोवारून घेतली आहे. पण शरीरीच्या कोणत्याच लक्षणांकडे, दुखण्यांकडे दुर्लक्ष न करता आणि स्वत:च्या मनाने उपचार करण्यापेक्षा सरळ डॉक्टरांचा सल्ला घ्या ते जास्त महत्त्वाचं आहे. तसेच किमान सहा महिन्यातून पूर्ण बॉडिचेक अप करणे कधीही चांगले.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात गुंड शाहरुख शेख चकमकीत ठार पुण्यात गुंड शाहरुख शेख चकमकीत ठार
पुण्यातील टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख (23) हा रविवारी पहाटे सोलापूर जिह्यातील मोहोळ तालुक्यात लांबोटी येथे...
मुंबई – गोवा महामार्गावर आरवली येथे भगदाड
Pune Bridge Collapse : पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 55 पर्यटक बुडाले, चार ठार, सहा गंभीर
Pune Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, उद्धव ठाकरे यांच्याकडून दुःख आणि संताप!!
राजकोटवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली अवघ्या महिनाभरात भगदाड, चिऱ्यांनी बांधलेला पाया खचला; फडणवीस-मिंध्यांचा महाभ्रष्ट कारभार
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 7 ठार… महाराष्ट्रातील दाम्पत्यासह चिमुकलीचा मृत्यू
ब्रिटनच्या लढाऊ विमानाचे केरळमध्ये इमर्जन्सी लँडिंग