विशाळगडावर ईद, उरुस साजरा केल्यास उधळून लावू; हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा

विशाळगडावर ईद, उरुस साजरा केल्यास उधळून लावू; हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा

ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर भरणाऱ्या मलिक रेहान उरूसातील प्राण्यांच्या कुर्बानीसाठी मुंबई हायकोर्टाने हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर सशर्त परवानगी दिली होती. या निर्णयाविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावर ईद आणि उरूस साजरा केल्यास उधळून लावू, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे.

दरम्यान, या उरूसावर कायमची बंदी घालावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना हिंदू एकता संघटनेच्या वतीने देण्यात आले. बकरी ईदच्या निमित्ताने मुंबई हायकोर्टान विशाळगडावर कुर्बानी देण्यास परवानगी दिली आहे. याबाबत काही नियम आणि अटी हायकोर्टाने घातल्या आहेत. मात्र, याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

बकरी ईदला अजून दोन दिवस आहेत, सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निर्णयाच्या विरोधात दाद मागावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकार कमी पडले, असे देखील आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बकरी ईदच्या तोंडावर पुन्हा एकदा विशाळगडचा मुद्दा आक्रमक होत आहे. आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास विशाळगडावरील उरूस उधळून लावू, असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला.

14 जुलै रोजी विशाळगडाच्या पायथ्याशी झाली होती दंगल

गतवर्षी 14 जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने गड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी या मोहिमेला हिंसक वळण लागले. गडाच्या पायथ्याशी असलेल्या मुसलमानवाडी या गावात जमावाने केलेल्या तोडफोडीत अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. हा अनुभव पाठीशी असताना, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गडावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. दि. 31 मेपर्यंत विशाळगडावरील बहुतांश अतिक्रमणे काढली आहेत. पण, मुख्य दर्गा असलेल्या ठिकाणी उरूस होऊ नये, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. याबाबत आता जिल्हा प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. परंतु या करंडकाच्या नावात बदल...
Photo किल्ले रायगडावर उत्साहात संपन्न झाला शिवराज्यभिषेक दिन सोहळा
मिंधे गटात जाणे ही फार मोठी चूक, पण आता माझ्या माहेरी परतले; सुजाता शिंगाडे यांचा शिवसेनेत प्रवेश
आरोग्यासाठी ही इवलीशी वेलची ठरते अमृत, तज्ञांनी सांगितले याचे आरोग्यदायी फायदे
केमिकल पद्धतीने पिकवलेले कलिंगड कसे ओळखावे? ‘या’ 5 ट्रिक्स करतील काम
आयुर्वेदानुसार चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन एकत्र करू नयेत, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान