समांथा रुथ प्रभूला झाला हा गंभीर आजार; म्हणून होतंय झपाट्याने वजन कमी, म्हणाली ‘मला माझं आयुष्य जगू द्या…’

समांथा रुथ प्रभूला झाला हा गंभीर आजार; म्हणून होतंय झपाट्याने वजन कमी, म्हणाली ‘मला माझं आयुष्य जगू द्या…’

सोमवारी मुंबईत झालेल्या व्होग ब्युटी अँड वेलनेस ऑनर्स कार्यक्रमात फॅशन आणि स्टाइलचा कार्यक्रम पार पडलाय. शिल्पा शेट्टी, सारा अली खानपासून ते अदिती राव हैदरीपर्यंत, अनेक अभिनेत्री त्यांच्या फॅशन ए-गेमचे प्रदर्शन करताना दिसल्या. पण एक अभिनेत्री होती जिच्या एन्ट्रीने सर्वांना आश्चर्यचकित केले. ती अभिनेत्री म्हणजे समंथा रुथ प्रभू. जिने व्होग ब्युटी अँड वेलनेस ऑनर्समध्ये तपकिरी रंगाचा कट-आउट ड्रेस परिधान करून सर्वांना थक्क केलं. इंटरनेटवर प्रत्येकजण फक्त एकच प्रश्न विचारत होते ते म्हणजे ‘समंथाला नक्की काय झालं आहे?’ ती तपकिरी रंगाच्या स्लीक आणि फिटिंग ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती, पण तिचे वजन कमी झालेले पाहून अनेकांना तिची काळजी वाटू लागली.

कट-आउट ब्राऊन ड्रेसमध्ये समांथा खूपच सुंदर दिसत होती पण… 

सामंथाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री स्ट्रॅपी आणि डीप टोन ड्रेस परिधान केलेली दिसली. या ड्रेसमध्ये कंबरेजवळ सुंदर कट-आउट होते, जे तिच्या स्लिम बॉडीला आधुनिक शैलीत हायलाइट करत होते. तिने मॅचिंग हाय हिल्स, हलका पण उठावदार मेकअप, स्टाईल केलेले मोकळे केस असा तिचा लूक पूर्ण होत होता. पण समांथाच्या सौंदर्यासोबतच तिचे अचानक वजन कमी झाल्याचीही बरीच चर्चा होत आहे. समंथाचे अचानक वजन कमी झालेले पाहून सर्वजण थक्क झाले आणि एका युजरने लिहिले की, ‘अरे देवा, तिचे वजन खूप कमी झाले आहे.’ एका युजरने कमेंट केली, “आज समांथा सामंथासारखी दिसत नाहीये. पहिल्या नजरेत ओळखता येत नाहीये… तिने खूपच वजन कमी केले आहे.”

समांथा ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त 

खरं तर, 2024 मध्ये, सामंथाने स्वत:च खुलासा केला होत की तिला मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ग्रासले आहे. तिने सांगितले होते की ती फारच स्ट्रिकली डाएट फॉलो करते. जेव्हा लोकांनी तिच्या वजन कमी करण्याबद्दल कमेंट केली तेव्हा तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याचं उत्तरही दिलं आहे, “ओह, आणखी एक वजन कमेंट… मी यावर एक संपूर्ण थ्रेड पाहिला. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वजन कमी करण्याचं मुख्य कारण म्हणजे मी माझ्या आजारासाठी आवश्यक असलेला कडक अँटी-इंफ्लेमेटरी डाएट घेत आहे. हा डाएट मला वजन वाढण्यापासून रोखतो आणि मला एका विशिष्ट वजनाच्या मर्यादेत ठेवतो जो माझ्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. कृपया लोकांनी जज करणे थांबवा आणि त्यांना ते जसे आहेत तसे राहू द्या. आयुष्य जगू द्या” असं म्हणत तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या वजन कमी करण्याबद्दल सांगितलं होत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)


एंटी-इंफ्लेमेटरी डाइट म्हणजे काय आणि त्यात काय खाणे टाळावे?

हार्वर्ड हेल्थच्या मते, आहाराद्वारे शरीराला येणाऱ्या सुजेला नियंत्रित करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळणे. यामध्ये अशा सर्व अन्नपदार्थांचा समावेश आहे जे त्यांच्या नैसर्गिक स्वरूपातून लक्षणीयरीत्या बदलले आहेत आणि सहसा पॅकेजमध्ये उपलब्ध असतात. जसे की रेडीमेड जेवण, आधीच शिजवलेले मांस (जसे की सॉसेज, चिकन नगेट्स), रेडीमेड सूप मिक्स, पॅकेज केलेले मिठाई, बिस्किट, प्रक्रिया केलेले डेली मीट, तयार सॉसेज. यामध्ये सहसा प्रिझर्व्हेटिव्ह्ज, रिफाइंड साखर, अस्वास्थ्यकर चरबी आणि कृत्रिम घटक असतात, ज्यामुळे शरीरात जळजळ वाढू शकते. याशिवाय, पांढरी ब्रेड, पारंपारिक पॅकेज केलेले धान्य, रिफाइंड पीठ पास्ता आणि पॉलिश केलेले पांढरे तांदूळ यांसारखे रिफाइंड धान्य उत्पादने देखील जळजळ वाढवू शकतात कारण त्यात फायबर आणि पोषक तत्वांचा अभाव असतो आणि शरीरात रक्तातील साखर वेगाने वाढते.

हे पदार्थ शरीरात सूज वाढवू शकतात

याशिवाय, काही इतर पदार्थ आहेत जे शरीरात सूज वाढवू शकतात, जसे की साखरेचे पेये (सोडा, पॅक केलेले फळांचे रस), बाजारात मिळणारे कुकीज आणि पेस्ट्री, बटर, चीज, फुल-फॅट आईस्क्रीम इ. बाजारात उपलब्ध असलेले पास्ता सॉस आणि बेकन, पेपरोनी, हॅम आणि सलामी यांसारखे प्रक्रिया केलेले मांस देखील शरीरातील चरबी ब्लड शुगर वाढवू शकतात.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता होणार धारावीचा पुनर्विकास; असा बदलणार चेहरामोहरा आता होणार धारावीचा पुनर्विकास; असा बदलणार चेहरामोहरा
मुंबईच्या मध्यभागी तब्बल 600 एकरवर धारावी पसरली आहे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) मास्टर प्लॅनला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा...
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढला, आज एवढ्या रुग्णांची नोंद
‘अजित पवार तुमचा माणूस…’, लक्ष्मण हाकेंचा पुन्हा अमोल मिटकरींवर घणाघात
vastu tips: वास्तूनुसार तुमच्या स्वयंपाकघर ‘या’ रंगांनी सजवा, घरातील सदस्य राहातील हेल्दी….
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक सिंहस्थ कुंभमेळाच्या पर्वणी जाहीर, जाणून घ्या अमृतस्नानाच्या तारखा
दुर्गराज रायगडावर सापडले प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र; खगोलशास्त्रीय अभ्यासाचा महत्त्वपूर्ण पुरावा
Mumbai News – मुंबई विमानतळावर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश, एका प्रवाशाला अटक