कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका! तीन पालकमंत्री आहेत कुठे? आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका! तीन पालकमंत्री आहेत कुठे? आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईची दैना होण्यास जबाबदार असणाऱया कंत्राटदारांना काळय़ा यादीत टाका, अशी मागणी करीत मुंबई बुडत असताना तीन पालकमंत्री आहेत तरी कुठे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुंबई तुंबण्याला अधिकारीही जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.

मुंबईत सोमवारपासून एण्ट्री केलेल्या पावसाने महापालिका आणि सरकारचे दावे सपशेल फेल ठरवून मुंबईची तुंबई केली. नाल्यांमधील गाळ, अर्धवट रस्ते आणि ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पालिका आणि सरकारसमोर ‘एक्स’वर सडकून टीका केली आहे. पाणी उपसण्याच्या कामामध्ये पंपांची देखभाल न करणाऱया पंत्राटदारांना 100 टक्के काळय़ा यादीत टाका, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. पालकमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात कार्यालयाच्या जागेसाठी अतिक्रमण केले. मग मुंबई ही त्यांची जबाबदारी नाही का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

‘हे’ लोक शहर चालवू शकत नाहीत!

मुंबईत तुंबल्यानंतर एकमेकांवर आरोप करणं सोपं आहे. ते जबाबदारीपासून पळ काढू शकतात, पण एक गोष्ट स्पष्ट आहे. सरकारमधील ‘हे’ लोक शहर चालवू शकत नाहीत.

‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या!

पालकमंत्र्यांवर मुंबईची जबाबदारी नाही का?

मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांचे काय?

मान्सूनपूर्व बैठकांचे काय? मुंबई का तुंबली?

मी वारंवार प्रश्न उपस्थित केलेल्या रस्ते घोटाळय़ाचे काय?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हेरगिरीच्या आरोपाखाली ATSने घेतलं ताब्यात, कारवाईनंतर रविकुमारचं लग्न मोडलं… हेरगिरीच्या आरोपाखाली ATSने घेतलं ताब्यात, कारवाईनंतर रविकुमारचं लग्न मोडलं…
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप असलेल्या अनेकांना भारतीय तपास संस्थांन ताब्यात घेतलं आहे. हाच तपास...
बँकॉकहून परतल्यानंतर भारती सिंग आजारी पडली; तापाने फणफणली; कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला
29 वर्षांत इतकी बदलली ‘परदेसी परदेसी’ गर्ल; ‘राजा हिंदुस्तानी’मधील अभिनेत्रीला ओळखणंही कठीण
‘देवमाणूस’मध्ये चक्क सई ताम्हणकर? फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!
बाळासाहेब ठाकरे यांचा ‘हा’ नातू बॉलिवूडमध्ये येण्याच्या तयारीत; राजकारणाची नाही तर ग्लॅमरची भुरळ
तुम्हालाही उजळ आणि सुंदर त्वचा हवी? या गोष्टींचा असा करा वापर
तांब्याच्या बाटलीतून पाणी किती वेळा प्यावं? अनेकजण करतात ही चूक