लबाडांनो पाणी द्या!शिवसेनेचा आज छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल महामोर्चा,आदित्य ठाकरे करणार नेतृत्व
महापालिका प्रशासनाच्या निष्ठूर कारभारामुळे शहरात भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाच दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन असतानाही बारा ते पंधरा दिवसांनी शहराला पाणी मिळत आहे. महापालिका प्रशासनाच्या या तुघलकी कारभाराला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने उद्या महापालिकेवर ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे करणार आहेत.
पाणीटंचाईविरोधात शिवसेनेच्या वतीने महिनाभर ‘लबाडांनो, पाणी द्या’ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा समारोप उद्या ‘हल्लाबोल’ मोर्चाने होणार आहे. दुपारी 4.30 वाजता क्रांतीचौकातून हा मोर्चा निघेल. गुलमंडीवर मोर्चाचा समारोप होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List