कटरा-श्रीनगर ‘वंदे भारत’चे बुकिंग फुल, विमानाचे प्रवासी रेल्वेकडे वळले, पर्यटक सुखावले

कटरा-श्रीनगर ‘वंदे भारत’चे बुकिंग फुल, विमानाचे प्रवासी रेल्वेकडे वळले, पर्यटक सुखावले

कटरा ते श्रीनगरदरम्यान वंदे भारत रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर 7 जूनपासून सुरू झालेल्या दोन गाड्या 25 जुलैपर्यंत जवळपास फुल आहेत. या दोन रेल्वे गाड्यांनी कश्मीर खोऱ्यात प्रवासाला नवा पर्याय दिला आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. स्वस्त तिकिटामुळे विमान प्रवासीही रेल्वेकडे वळत आहेत.

रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्यिक प्रबंधक उचित सिंघल यांनी सांगितले की, कटरा-श्रीनगर लोकांना रेल्वे मार्ग खूप आवडत आहे. रोज किमान एक हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सोपोरचे व्यापारी फारूक अहमद म्हणाले की, आम्ही माल वेळेवर जम्मू आणि इतर बाजारात पाठवू शकत आहोत. कश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीने म्हटले की, रेल्वेने ने-आण खर्च घटला. शोएब हुसेन यांनी म्हटले की, वेळेवर पुरवठा करता येत आहे. विमानाचे प्रवासी रेल्वेकडे वळल्याने रेल्वेची प्रवासी संख्या घटली आहे.

  • कटराहून पहिली रेल्वे सकाळी 8.10 वाजता निघते ती 11.08 वाजता श्रीनगरला पोहोचते. दुसरी दुपारी 2.55 वाजता निघून सायंकाळी 5.53 वाजता पोहोचते. श्रीनगरहून सकाळी 8 आणि दुपारी 2 वाजता रेल्वे आहे. इकॉनॉमी क्लासचे भाडे 700-800 रुपये तर एक्झिक्युटिव्हचे भाडे 1,300-1,400 रुपये इतके आहे.
  • आधी दिल्ली-श्रीनगर विमान भाडे 12 ते 15 हजार रुपये होते, मात्र वंदे भारत सुरू झाल्यानंतर ते 6 ते 8 हजार रुपये झाले आहे. रेल्वेला पर्यटकांची पसंती मिळत आहे. वंदे भारतमुळे प्रवास स्वस्त झाला.
  • लोक रेल्वेने येण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच हॉटेलचे बुकिंगही वाढत आहे. विमानांमध्ये 15 टक्के आसने रिकामी राहत आहेत. एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेमुळे उड्डाणे आणि प्रवासी कमी झाले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रात्री पाय धुवूनच झोपायला का जावं? तज्ज्ञ काय सांगतात? रात्री पाय धुवूनच झोपायला का जावं? तज्ज्ञ काय सांगतात?
दिवसभर जवळपास सर्वांचाच वेळ हा खूप धावपळीत जातो. काम केल्यानंतर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. पण हा सर्व ताण जाणवतो तो...
Sangli News – NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षक पित्याकडून बेदम मारहाण, मुलीचा मृत्यू
American base in Syria Attacked : सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर हल्ला, पण…
पृथ्वी शॉ मुंबईला राम राम करण्याच्या तयारीत, MCA ला पत्र लिहीत NOC ची केली मागणी
Chardham Yatra Incident – उत्तरकाशीत यमुनोत्री मार्गावर भूस्खलन, 2 ते 3 यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता
Israel Iran Conflict : अमेरिकेने इराणवर विनाकारण हल्ला केला, पुतिन यांनी हल्ल्यांचा केला निषेध
दिल्ली-जम्मू-दिल्ली; दिल्लीहून एअर इंडियाचं विमान जम्मूला गेलं आणि जम्मूहून लँडिंग न करता दिल्लीत परतलं, कारण काय?