गेल्या 15 वर्षांत लोकल अपघातात मृत पावलेल्यांपैकी एक तृतीयांश मृतदेहांची ओळखच पटली नाही, माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती

गेल्या 15 वर्षांत लोकल अपघातात मृत पावलेल्यांपैकी एक तृतीयांश मृतदेहांची ओळखच पटली नाही, माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती

गेल्या 15 वर्षांत मुंबईतील रेल्वे मार्गांवर मृत्यू झालेल्यांपैकी जवळपास एकतृतीयांश मृतदेहांची ओळखच पटलीले नाहिये. या मृतदेहांची ओळख न पटल्याने त्यांच्या मृतदेहाचा ताबा कुणालाच देता आलेला नाहिये. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

माहिती अधिकारातून माहिती मिळाली आहे की, 2009 ते 2024 या काळात मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गांवर ट्रेनमधून पडून किंवा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालेल्यांपैकी 14,000 हून अधिक लोकांची ओळख पटलेली नाही. बहुतांश हे मृत्यू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा आणि खोपोली (मध्य रेल्वे), सीएसएमटी ते पनवेल (हार्बर मार्ग) आणि चर्चगेट ते डहाणू (पश्चिम रेल्वे) या मार्गांवर झाले आहेत.

एकूण 46 हजार 969 मृतांपैकी 14 हजार 513 (31%) मृतदेहांची ओळख पटवता आली नाही. महाराष्ट्र रेल्वे पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न केला पण तरी ते सापडले नाहीत.

रेल्वे अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवणं फार जिकरीचं असतं अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच कधी कधी मृतदेह इतका छिन्न विच्छिन्न होतो की त्यांची ओळखही पटवता येत नाही. कधी तर त्यांच्याकडे ओळखपत्र आणि मोबाईल फोनही नसतो त्यामुळे ओळख पटवणं आणखीनच आव्हानात्मक होऊन जातं असं पोलिसांनी सांगितलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जगात शांततेसाठी हिंदुस्थानची भूमिका महत्त्वाची, इस्रायल-इराण युद्धावर मल्लिकार्जुन खर्गे यांचं वक्तव्य जगात शांततेसाठी हिंदुस्थानची भूमिका महत्त्वाची, इस्रायल-इराण युद्धावर मल्लिकार्जुन खर्गे यांचं वक्तव्य
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे इस्रायल-इराण संघर्षावर भाष्य करताना जगात शांततेची गरज असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले,...
IND Vs ENG 1st Test – केएल राहुल-ऋषभ पंतची बॅट तळपली, टीम इंडियाची भक्कम आघाडीच्या दिशेने वाटचाल
Jammu Kashmir – वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन, बॅटरी कार सेवा आणि तीर्थयात्रा विस्कळीत
Pahalgam Terror Attack : जम्मू-कश्मीर पोलिसांनी संशयितांचे जारी केलेले ‘स्केच’ चुकीचे? सूत्रांच्या माहितीनंतर देशभरात संताप
Video हा पहा सरकारचा “विकास” … शहापूरच्या चाफेपाड्यात ना रस्ता, ना वीज; गर्भवती मातेचा भर पावसात ‘झोळी प्रवास’
पतीला संपवण्यासाठी विष आणलं, मग असं काय घडलं की पत्नीनेच ते प्राशन करत जीवन संपवलं?
Buldhana News धक्कादायक! शिक्षणमंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडून शाळेने करून घेतली साफसफाई, व्हिडीओ व्हायरल