चिंता नको! एआयमुळे नोकऱ्या निर्माण होतील, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केले स्पष्ट

चिंता नको! एआयमुळे नोकऱ्या निर्माण होतील, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केले स्पष्ट

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) नोकऱ्या धोक्यात आल्याची चिंता व्यक्त होत आहे. एआयमुळे तब्बल एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आल्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी लक्षवेधी वक्तव्य केले. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, उलट कर्मचाऱ्यांसाठी ते मदतीचे ठरेल, असे सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले. कंपनी नवीन उत्पादने आणि नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करत असून त्यामुळे भविष्यात अधिक नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सॅन फ्रॉन्सिस्को येथे सुंदर पिचाई म्हणाले, एआय कामात वेग वाढवण्याचे टूल आहे. एआयच्या मदतीने काम जास्त वेगाने होणार आहे. एआयमुळे गुगलमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार नाही तर भविष्यात वाढेल. एआयच्या मदतीने नवीन उत्पादने तयार केली जातील आणि त्यामुळ नोकऱ्या वाढतील. गुगलमध्ये यापूर्वी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकले गेले आहे, हे खरे आहे. 2023 मध्ये कंपनीने 12 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आणि गेल्या वर्षी एक हजाराहून अधिक लोकांना कमी केले. 2025 मध्ये ही संख्या खूपच कमी असल्याचे पिचाई यांनी सांगितले.

सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले की, एआयमुळे कर्मचाऱ्यांना घाबरून जाण्याची अजिबातच गरज नाहीये. एआय कोणाच्याही नोकऱ्या काढून घेणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फूड अ‍ॅलर्जी आहे की नाही कसे ओळखावे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार फूड अ‍ॅलर्जी आहे की नाही कसे ओळखावे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
आपल्यापैकी अनेकांना धुळीची, धुराची, तसेच पदार्थांची ॲलर्जी होत असते. त्यात असे अनेकजण आहेत जे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचे शौकीन आहेत. अशातच...
वजन कमी करण्यासाठी ‘या’ 5 सवयी अंगीकारा, फक्त एका महिन्यात तुम्हाला दिसतील आश्चर्यकारक परिणाम
फक्त अंडीच नाही तर ‘या’ भाज्या देखील आहेत प्रथिनांचे मुबलक स्त्रोत
अपघाताची जबाबदारी रेल्वे टाळू शकत नाही; अजित पवार यांचे स्पष्ट मत
Skin Care – आंघोळीपूर्वी फक्त या 5 गोष्टी करा, तुमचा चेहरा ब्राइडल फेशियल केल्यासारखा चमकेल!
मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे फक्त प्रचार, मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातावरून राहुल गांधी यांची टीका
टेंभुर्णी- अकलूज मार्गावर दोन दुचाकींची धडक; तिघांचा मृत्यू, दोनजण जखमी