समृद्धी महामार्गावरील पुलाला भगदाड; फडणवीस – मिंधे सरकारच्या चमकोगिरीला ‘तडा’

समृद्धी महामार्गावरील पुलाला भगदाड; फडणवीस – मिंधे सरकारच्या चमकोगिरीला ‘तडा’

विकासाचा मोठा दिखावा करून वाहतुकीसाठी खुला केलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बांधकामाचा निकृष्ट दर्जा उजेडात आला आहे. माळीवाडा परिसरातील पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने वाहनधारक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन वर्षांत भगदाड पडल्याने महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या लोकार्पणावेळी फडणवीस-मिंधे सरकारने केलेल्या चमकोगिरीला मोठा झटका बसला आहे.

समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षेही झालेली नाहीत. इतक्या कमी अवधीतच माळीवाडा येथील पुलाच्या मधोमध भगदाड पडले. पुलाचा काही भाग खाली कोसळला, त्यावेळी सुदैवाने पुलाखाली कोणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र या घटनेने महायुती सरकारच्या कालावधीत झालेल्या निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे. सरकारने नुकताच महामार्गाचा अंतिम टप्पा खुला केला. सरकार एकीकडे वेगवान विकासाचा दिखावा करण्यासाठी समृद्धी महामार्गाचे उदाहरण देत आहे. असे असताना या महामार्गाच्या कामाचा दर्जा चांगला ठेवण्यात सरकार निष्क्रिय कसे काय ठरले, असा संतप्त सवाल वाहनधारक आणि प्रवाशांनी उपस्थित केला आहे. भगदाड पडण्याच्या घटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विविध दाव्यांपुढे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दुरुस्तीची मलमपट्टी
भगदाड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग विभागाने समृद्धी महामार्गाचे काम करणाऱया मेघा पंपनीला तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. पंपनीने भगदाड पडलेल्या ठिकाणी दुरुस्तीची तात्पुरती मलमपट्टी केली. अशा प्रकारे केलेले निकृष्ट काम वाहनधारक आणि प्रवाशांच्या जिवावर बेतल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न स्थानिक रहिवासी, वाहनचालकांकडून केला जात आहे.

एमएसआरडीसीचा दावा फोल

समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी एम-40 ग्रेडचे सिमेंट वापरल्याने 20 वर्षे खड्डे पडणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) म्हटले होते, मात्र दोन वर्षांत खड्डे, भगदाड पडल्यामुळे एमएसआरडीसीचा दावा पह्ल ठरला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रस्त्यांचेही काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघडकीस आले आहे. पावसाळय़ात या मार्गावर प्रवास करणे अपघाताला निमंत्रण देणारे असल्याची भीती वाहनधारकांमध्ये आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय
मुंब्रा स्थानकादरम्यान अपघात होऊन सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्याच्या लोकल असतील असा निर्णय घेण्यात...
मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज
Monsoon Trekking- पावसाळी ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या
प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;चित्रपटसृष्टीवर शोककळा
आलिया भट्ट-रणबीर कपूरचा 250 कोटींचा बंगला तयार, मात्र नवीन गेट बांधण्यासाठी पैसे नाहीत! वाचा
गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान