दोन-तीन दिवसांत मान्सूनचा जोर वाढणार; मुंबईत येलो अलर्ट, कोकणात ‘जोर’धारा कोसळणार

दोन-तीन दिवसांत मान्सूनचा जोर वाढणार; मुंबईत येलो अलर्ट, कोकणात ‘जोर’धारा कोसळणार

मागील 15 दिवस दडी मारलेल्या मोसमी पावसाचा मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रातील जोर वाढणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबई शहर व उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे, तर दक्षिण कोकणला अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याअनुषंगाने मुंबईला येलो अलर्ट आणि दक्षिण कोकणला ऑरेंट अलर्ट जारी केला आहे.

मे महिन्यात जोरदार हजेरी लावणारा पाऊस जूनमध्ये काही दिवस (19 जून) वगळता ‘थंड’च पडला. आता मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकण किनारपट्टी भागात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. दक्षिण कोकणात, विशेषतः रायगड जिह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातही पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या तिन्ही जिह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करून स्थानिक नागरिकांसह मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह आसपासच्या ठाणे आणि पालघर या जिह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

n भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत कुलाबा केंद्रावर 477 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा 130 मिमी जास्त आहे. तसेच सांताक्रूझ केंद्रावर सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 425 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मान्सून 15 दिवस गायब राहिला. त्यात फक्त 19 जून रोजी कुलाब्यात रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. त्या दिवशी 24 तासांत 146 मिमी पावसाची नोंद झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रात्री पाय धुवूनच झोपायला का जावं? तज्ज्ञ काय सांगतात? रात्री पाय धुवूनच झोपायला का जावं? तज्ज्ञ काय सांगतात?
दिवसभर जवळपास सर्वांचाच वेळ हा खूप धावपळीत जातो. काम केल्यानंतर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. पण हा सर्व ताण जाणवतो तो...
Sangli News – NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षक पित्याकडून बेदम मारहाण, मुलीचा मृत्यू
American base in Syria Attacked : सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर हल्ला, पण…
पृथ्वी शॉ मुंबईला राम राम करण्याच्या तयारीत, MCA ला पत्र लिहीत NOC ची केली मागणी
Chardham Yatra Incident – उत्तरकाशीत यमुनोत्री मार्गावर भूस्खलन, 2 ते 3 यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता
Israel Iran Conflict : अमेरिकेने इराणवर विनाकारण हल्ला केला, पुतिन यांनी हल्ल्यांचा केला निषेध
दिल्ली-जम्मू-दिल्ली; दिल्लीहून एअर इंडियाचं विमान जम्मूला गेलं आणि जम्मूहून लँडिंग न करता दिल्लीत परतलं, कारण काय?