पत्र पाठवा… उत्तर देतो, महाराष्ट्रातील निवडणूक फिक्सिंगचा राहुल गांधींचा लेख आयोगाला झोंबला

पत्र पाठवा… उत्तर देतो, महाराष्ट्रातील निवडणूक फिक्सिंगचा राहुल गांधींचा लेख आयोगाला झोंबला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळय़ाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखानंतर चौफेर टीका होऊ लागल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाला चांगलेच झोंबले आहे. आयोगाने आज त्यावर स्पष्टीकरणही दिले. मीडियामधून विचारणा करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाला पत्र पाठवा, उत्तर देतो, असे आयोगाने म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या प्रश्नांबाबत

24 डिसेंबर 2024 रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून त्यात सर्व मुद्दय़ांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे, असा दावा आयोगाने केला आहे. ‘निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास आम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत. राहुल गांधी यांनीही माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावा.’ असे आयोगाने स्पष्टीकरणात म्हटले आहे.

राहुल गांधींनी आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना भाजपाकडून उत्तरे म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच असून, विधानसभा निवडणूक प्रक्रियेत घोटाळा नव्हता तर मारकडवाडीत माक पोल का होऊ दिला नाही, असा सवाल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला, तर आम्ही पुराव्यानिशी मतदार याद्यातील घोटाळा व बोगस मतदान दाखवतो, हिंमत असेल तर भाजप नेत्यांनी ते खोडून दाखवावे, असे आव्हान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा – काँग्रेस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नाकाx टेस्ट करा, अशी मागणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय
मुंब्रा स्थानकादरम्यान अपघात होऊन सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्याच्या लोकल असतील असा निर्णय घेण्यात...
मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज
Monsoon Trekking- पावसाळी ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या
प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;चित्रपटसृष्टीवर शोककळा
आलिया भट्ट-रणबीर कपूरचा 250 कोटींचा बंगला तयार, मात्र नवीन गेट बांधण्यासाठी पैसे नाहीत! वाचा
गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान