मुंबईकरांच्या हक्काच्या जमिनींची अदानीकडून लूट; कुर्ला मदर डेअरीची जमीन देण्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन

मुंबईकरांच्या हक्काच्या जमिनींची अदानीकडून लूट; कुर्ला मदर डेअरीची जमीन देण्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली राज्य सरकारने मदर डेअरीची 21 एकरची जमीन अदानी समूहाला दिली. डेअरीची जमीन मुंबई आणि मुंबईकरांसाठी पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असूनही केवळ अदानीसाठी ती हस्तांतरित करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने मुंबईकरांच्या हक्काच्या जमिनी लुटण्याचा भस्म्या रोग अदानीला झाला आहे. मात्र, ही जागा अदानीच्या घशात घालण्याऐवजी इथे वनस्पती उद्यान उभारा, स्थानिकांसाठी सोयीसुविधा उभारा, अशी मागणी करत आज कुर्ला येथे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.

कुर्ल्यातील मदर डेअरीची 21 एकर जागा अदानीला धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याविरोधात कुर्लावासीयांनी खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वर्षा गायकवाड म्हणाल्या, मोदानी अॅण्ड पंपनी लोकांचे हक्क हिरावून घेत आहे, मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकावल्या जात आहेत. मात्र, ही लूट करणा-या चोरांनाच सरकार सुरक्षा देत आहे. मात्र, आम्ही मुंबईच्या हक्कासाठी, मुंबईकरांच्या भविष्यासाठी या अदानी सरकारविरुद्ध लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार ज्योती गायकवाड, सुभाष भालेराव, सुरेशचंद्र राजहंस, महेंद्र मुणगेकर, संदीप शुक्ला, अवनीश सिंह, कचरू यादव, माजी नगरसेवक अशरफ आझमी, वंदना साबळे, अजंता यादव, इंदूप्रकाश तिवारी, राजेश इंगळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी उपस्थित होते.

कोटय़वधीची जमीन अदानीला कवडीमोलाने 

कुर्ला मदर डेअरीच्या जागेचे बाजारमूल्य शेकडो कोटी रुपयांत आहे, मात्र भाजपने ही जमीन अदानीला कवडीमोलाने दिली आहे. मुंबईत भाजप सरकारच्या आशीर्वादाने अदानीची महालूट सुरू आहे. ही लुटालूट थांबता थांबत नाही. त्यासाठी आता धारावीसह मुंबईकरांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय
मुंब्रा स्थानकादरम्यान अपघात होऊन सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्याच्या लोकल असतील असा निर्णय घेण्यात...
मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज
Monsoon Trekking- पावसाळी ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या
प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;चित्रपटसृष्टीवर शोककळा
आलिया भट्ट-रणबीर कपूरचा 250 कोटींचा बंगला तयार, मात्र नवीन गेट बांधण्यासाठी पैसे नाहीत! वाचा
गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान