Curd Rice Benefits- जेवणाची सांगता करताना दही भात खाणे का महत्त्वाचे आहे? वाचा यामागची आर्युर्वेदीय कारणे

Curd Rice Benefits- जेवणाची सांगता करताना दही भात खाणे का महत्त्वाचे आहे? वाचा यामागची आर्युर्वेदीय कारणे

आपल्याकडे फार पूर्वीपासून आपल्या आहाराला आर्युर्वेदाची जोड आहे. म्हणूनच आपल्या बहुतांशी खाण्याच्या सवयी या आर्युर्वेदाच्या आसपास असतात. फार पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे जेवणाची सांगता करताना, किमान दोन घास दही भात खाण्याची पद्धत होती. आज ही पद्धत लुप्त होत चालली आहे.

निरोगी आरोग्यासाठी आहारही परिपूर्ण असायलाच हवा. आपण आहार जितका उत्तम ठेवू तितकी आपली प्रकृत्ती उत्तम राहते. म्हणूनच आहारात काही साधे सोपे बदलही खूप महत्त्वाचे आहेत. आहारामध्ये दहीभाताचा समावेश केल्यास आपल्याला खूप फायदा मिळतो. दही भात हा एक असा पदार्थ आहे याला पाहून अनेकजण नाक मुरडतात. परंतु काही लोकांना दही भाताशिवाय घासही जात नाही. दही भात पचायला हलका असल्याने, त्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा भरपूर आहेत.

दह्यासोबत भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळेच सध्याच्या घडीला अनेकांनी आहारात दही भाताचा समावेश केलेला आहे. दही आणि भात खाल्ल्याने वजन कमी होते आणि हाडेही मजबूत होतात. दही आणि भात खाण्याचे आणखी अनेक फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

दहीभात खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

वजन कमी करणाऱ्यांसाठी दही भात हा एक उत्तम पर्याय मानला गेला आहे. परंतु याजोडीला आवश्यक व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे. दही भाताचा आहारात समावेश केल्यामुळे भूक कमी लागते. यामुळेच वजन कमी होण्यासही खूप मदत होते.

दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते असे संशोधनात सिद्ध झाले आहे.

मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गोष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते.

दही भात खाण्यामुळे आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात.

दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता.

दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासही मदत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

Curd Benefits- आपल्या आहारात दही का असायला हवे जाणून घ्या! 

भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र दही भात खाणे हितकारक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढत नाही तर कमी होतं.

 

तापात आपल्याला काहीच खाण्याची इच्छा होत नाही, परंतु तापामध्ये दही भात खाल्ल्यावर, शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे इम्मुनिटी देखील वाढते.

 

पोट बिघडल्यावर दही भात हा उत्तम उपाय आहे. दही भाताने पोट शांत होते, तसेच अन्नही व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘क्या हुआ तेरा वादा’? शिवसेनेच्या चक्काजाम आंदोलनाने छत्रपती संभाजीनगर दणाणले, महावीर चौकात तासभर वाहतूक ठप्प ‘क्या हुआ तेरा वादा’? शिवसेनेच्या चक्काजाम आंदोलनाने छत्रपती संभाजीनगर दणाणले, महावीर चौकात तासभर वाहतूक ठप्प
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची सत्ता मिळताच पूर्तता न करता जनतेला वार्‍यावर सोडणार्‍या महायुतीला क्या हुआ तेरा वादा? असा खणखणीत सवाल...
14 तास नाॅनस्टाॅप कर्करोगाची शस्त्रक्रिया, दीपिका कक्करची भावूक पोस्ट
‘चल हल्ला बोल’ नामदेव ढसाळांवरील चित्रपट फक्त प्रौढांसाठी! सेन्साॅर बोर्डाचा अजब निर्णय
No emotion, no love , no f××k! दोन दिवसांपूर्वी पोस्ट केली अन् लाखो फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुयन्सरचा आज मृतदेह आढळला
…तर न्यायव्यवस्था हस्तक्षेप करणारच, मात्र अतिरेक टाळावा! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत
लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव?
ट्रम्प हिंदुस्थानचा अपमान करत असताना मोदी गप्प आहेत, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण – संजय राऊत