गळणाऱ्या केसांवर रामबाण आहे हे पतंजलीचे औषध, असे करते परिणाम

गळणाऱ्या केसांवर रामबाण आहे हे पतंजलीचे औषध, असे करते परिणाम

आजकल केस गळण्याची समस्या सर्वसामान्य झाली आहे. कमी वयात लोकांचे केस गळत आहेत. मानसिक तणाव, खराब आहार, जीवनमान तसे हार्मोन्समधील बदल आणि प्रदुषण यामुळे लोकांचे केस गळत आहेत. महिला असो वा पुरुष सर्वांनाच केस गळतीची समस्या सुरु आहे. बाजारात केस गळतीवर अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. जे केस गळती रोखण्याचा दावा करीत असतात. पतंजलीचे एक आयुर्वेदिक औषध केस गळती रोखण्यात खूपच असरदार झाले आहे.

पतंजलीने केस गळतीची समस्येला दूर करण्यासाठी जे औषध तयार केले आहेत. ते आयुर्वेदिक जडी-बुटीपासून तयार केले आहे.या औषधांचे नाव पतंजली दिव्य केश तेल आणि दिव्य केश कांती टॅबलेट आहे. खास करुन केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी आणि नवीन केस उगवण्यासाठी तयार केले आहे. या औषधात ब्राह्मी, आंवला, भृंगराज, जटामांसी आणि अश्वगंधा सारख्या शक्तीशाली आयुर्वेदिक जडी-बुटींचा वापर केला गेला आहे. या जडीबुटी केवळ केसांचे पोषणच करत नाहीत तर डोक्याच्या त्वचेतील रक्तसंचार वाढवतात. त्यामुळे केस गळतीचे प्रमाण कमी होते.

पतंजली औषध रिसर्चमध्ये परिणामकारक

पतंजली रिसर्च इंस्टीट्यूटने केलेल्या एका संशोधनात असा दावा केला आहे की नियमित रूपाने याच्या वापर करणाऱ्यांचा अभ्यास केला. तेव्हा याचे रिजल्ट आश्चर्यकारक निघाला. संशोधनात आढळले की ८० टक्क्याहून अधिक लोकांची केस गळती कमी झाली होती. काही प्रकरणात नवीन केस वाढ झाल्याचेही निदर्शनास आले. ज्या लोकांनी पतंजलीचे दिव्य केश कांती टॅबलेट आणि तेल सातत्याने 8 ते 12 आठवडे वापरले. त्यांच्या केसांच्या गुणवत्तेत सुधारणा दिसली आणि त्यांचा स्कॅल्प हेल्थी आढळला.

कसा करायचा वापर ?

दिव्य केश तेल- रात्री झोपताना केसांच्या मुळांना बोटांनी हलक्या हाताने लावायचा. मसाज केल्या प्रमाणे तो हलक्या हाताने चोळायचा आणि रात्रभर तसाच ठेवू द्यायचा. त्यानंतर सकाळी माईल्ड शॉम्पूने केस धुवायचे

दिव्य केश कांती टॅबलेट- डॉक्टरच्या सल्ल्यानुसार रोज एक ते दोन टॅबलेट कोमट पाण्यासोबत घेणे

कोणत्या लोकांना मिळणार सर्वाधिक फायदा?

हे औषध या लोकांसाठी रामबाण आहे जे लोक खूप काळापासून केस गळतीने त्रस्त आहेत, आणि केमिकल्सचा वापर करुन थकलेले आहेत.हे केसांच्या मुळांचे पोषण करते. ज्यामुळे केस मजबूत आणि दाट तसेच चमकदार बनतात. बाजारात हे औषध लोकांना खूपच पसंद ठरलेले आहे. अनेक लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या औषधाचे चांगले रिझल्ट आल्याचे म्हटले आहे.अनेक लोकांनी महागडी ट्रीटमेंट सोडून या आयुर्वेदिक औषधांचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे त्यांना खरा आराम मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;