अखेर ठाणे पालिकेने दिव्यातील कचरा उचलला; शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग

अखेर ठाणे पालिकेने दिव्यातील कचरा उचलला; शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग

दिवा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 28 मधील कचरा जवळपास 8 महिन्यांपासून उचलला गेला नव्हता. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ठाणे महापालिका प्रशासनाला कचरा उचलला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली असून अखेर ठाणे पालिकेने दिव्यातील कचरा तत्काळ उचलला आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 28 मधील दातिवलीगाव स्मशानभूमीजवळील कचरा जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून उचलला गेला नव्हता. त्या कचरा टाकलेल्या जागेची डम्पिंग ग्राऊंडपेक्षा वाईट परिस्थिती झाली होती. त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांवर व शाळेतील विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात होत होता. तेथील नागरिकांनी शिवसेनेच्या दातिवली शाखेत तक्रारदेखील केली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण ग्रामीण महिला विधानसभा संघटक योगिता नाईक यांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. कचरा तत्काळ उचलावा अशी विनंती करत आंदोलनाचा इशारा नाईक यांनी दिला होता.

अधिकाऱ्यांनी जेसीबी व डंपर मागवले
झोपेचे सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. अधिकाऱ्यांनी कचरा उचलण्यासाठी आज तत्काळ जेसीबी व डंपर मागवले. हा परिसर कचरामुक्त केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. इतक्या महिन्यात न उचललेला कचरा उचलला गेला असल्याने योगिता नाईक यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय
मुंब्रा स्थानकादरम्यान अपघात होऊन सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्याच्या लोकल असतील असा निर्णय घेण्यात...
मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज
Monsoon Trekking- पावसाळी ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या
प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;चित्रपटसृष्टीवर शोककळा
आलिया भट्ट-रणबीर कपूरचा 250 कोटींचा बंगला तयार, मात्र नवीन गेट बांधण्यासाठी पैसे नाहीत! वाचा
गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान