निवडणूक आयोग नमलं! महाराष्ट्र आणि हरयाणाच्या मतदार याद्यांचा डेटा देणार; राहुल गांधींची मागणी मान्य
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर निवडणूक आयोग अखेर नमलं आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार यादीचा डेटा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याबाबत राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखानंतर चौफेर टीका होऊ लागल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे, असं बोललं जात आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आता राहुल गांधी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. राहुल गांधी यांनी X वर एक पोस्ट करत निवडणुकांचा डेटा शेअर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी विचारले आहे की, हा डेटा डिजिटल, मशीन-रीडेबल फॉरमॅटमध्ये कधी शेअर केला जाईल, याची नेमकी तारीख निवडणूक आयोग जाहीर करू शकेल का?
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत ढळढळीत हेराफेरी केली गेली. ही निवडणूक भाजपने चोरली. ही छोटी-मोठी गडबड नसून, आपल्या राष्ट्रीय संस्थांवर कब्जा करून मोठ्या प्रमाणावर घोटाळे केले जात आहेत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका लेखाद्वारे केला. त्यांच्या या लेखामुळे केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या मॅच फिक्सिंग कारभारावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यातच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार यादीचा डेटा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Good first step taken by EC to hand over voter rolls.
Can the EC please announce the exact date by which this data will be handed over in a digital, machine-readable format? pic.twitter.com/SbW3DrCapK
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 9, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List