पहलगाम हल्ल्यानंतर टॅक्सीचालक हतबल, आता भिस्त फक्त अमरनाथ यात्रेवर!

पहलगाम हल्ल्यानंतर टॅक्सीचालक हतबल, आता भिस्त फक्त अमरनाथ यात्रेवर!

पहलगाम हल्ल्यानंतर कश्मिरची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. जून आणि जुलै महिना हा कश्मिर पर्यटनासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. याच महिन्यात बहुतांशी पर्यटक कश्मिरला भेट देतात. परंतु पहलगाम हल्ल्यानंतर निवडक पर्यटक केवळ कश्मिरला भेट देत आहेत. जून आणि जुलै महिन्यात पहलगाममधील टॅक्सी स्टँडवर उभे राहण्यासाठी जागा नसे असे चित्र असायचे. परंतु पहलगाम हल्ल्यानंतर मात्र संपूर्ण चित्र पालटले आहे.

दरवेळी जून, जुलैच्या हंगामात लाखो पर्यटक येथे येत असत. पण पहलगाम हल्ल्यानंतर मात्र सगळं बदललं आहे. गेल्या चार दशकांपासून येथे वाहनांवर काम करणारे नझीर अहमद म्हणतात, “टॅक्सी स्टँडवर सुमारे 500 वाहने असायची. पहलगाममधील 1200 हून अधिक लोक पूर्णपणे टॅक्सीचालनाच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. सध्याच्या घडीला आम्ही अमरनाथ यात्रेची वाट पाहत आहोत. एकूणच आमची परिस्थिती आता बिकट होत चालली आहे.” अनेक टॅक्सीचालक सध्याच्या घडीला वाहने विकण्याच्या तयारीत आहेत. काहीच कमाई होत नसल्याने, ईएमआय भरायलाही पर्यटकांकडे पैसा नाही. म्हणूनच टॅक्सीचालक सरकारला विनंती करत आहेत. आमची वाहने घ्या आणि आम्हाला पैसे तरी द्या.

सध्याच्या घडीला पहलगाम मधील आसपासच्या परिसरात अजून, उद्याने सुरु नाहीत. केवळ ठराविक स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मुभा आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारीत व्यवसायांना फार मोठा धक्का बसला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्याच्या इतक्या दिवसांनंतरही कश्मीरमध्ये शांतता आहे आणि पहलगाममध्ये दहशतवादाचे पडसाद आजही ऐकू येत आहेत.

नझीर अहमद म्हणतात, “अमरनाथ यात्रेची तयारी सुरू आहे. पण आमचा व्यवसाय मात्र 100 टक्के उद्ध्वस्त झाला आहे. आम्हाला कोणताही आधार नाही आणि 22 तारखेच्या घटनेनंतर, आमच्यावर कुऱ्हाड कोसळली आहे. आमचे कुटुंब आणि मुले सध्या बिकट अवस्थेमध्ये आहेत. कुटूंबाची गुजराण होणेही आता कठीण होत आहे, आमच्याकडे जे काही थोडे शिल्लक होते ते संपत आहे.”

सध्याच्या काळात कश्मिरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरू होईल. किमान या यात्रेवेळी लाखो पर्यटक येतील. या आशेवर आता कश्मिरमधील व्यवसाय आशेवर आहेत. नझीर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले की, ” सध्या इथल्या बाजारपेठांमध्ये स्मशनाशांतता आहे. आम्हाला असे वाटते की, धर्माच्या नावाखाली जे काही घडले ते पूर्णपणे चुकीचे होते.

गेल्या तीन दशकांपासून पहलगाम टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम नबी म्हणाले की, अमरनाथ यात्रेदरम्यान किमान एक महिना पैसे मिळावेत म्हणून आम्ही वाहने तयार ठेवली आहेत. आता किमान सरकारने आणखी नुकसान पोहोचू नये म्हणून सर्व पर्यटनस्थळे उघडली तर किमान पर्यटन वाढेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय
मुंब्रा स्थानकादरम्यान अपघात होऊन सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्याच्या लोकल असतील असा निर्णय घेण्यात...
मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज
Monsoon Trekking- पावसाळी ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या
प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;चित्रपटसृष्टीवर शोककळा
आलिया भट्ट-रणबीर कपूरचा 250 कोटींचा बंगला तयार, मात्र नवीन गेट बांधण्यासाठी पैसे नाहीत! वाचा
गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान