राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार, शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे पूर्ण करण्याचा सल्ला

राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार, शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे पूर्ण करण्याचा सल्ला

हवेचा दाब वाढल्याने मान्सूनची प्रगती थांबली आहे. मात्र, 12 जूननंतर हवेचा दाब कमी होणार आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाफसे तयार झाले असतील तर शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे पूर्ण करावीत, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

यंदा मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. मे महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने ओढे, नद्या, नाल्यांना पूर आला. तसेच, अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता आहे. हवामान बदलामुळे खंडात्मक पर्जन्यमानात बदल झाले आहेत. काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस, असा मान्सून बरसणार आहे, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.

कमाल तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर यंदा राज्यात 106 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला पाडेगाव आणि कोल्हापूर येथे पावसात खंड राहण्याची शक्यता आहे. दापोली, पुणे, नागपूर, सोलापूर, जळगाव, धुळे व कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहणार आहे.

पश्चिम विदर्भ विभागात सरासरीच्या 105 टक्के, पूर्व विदर्भ आणि मध्य विदर्भ विभागात सरासरीच्या 100 टक्के, मराठवाडा विभागात सरासरीच्या 110 टक्के, कोकणात सरासरीच्या 106 टक्के, उत्तर महाराष्ट्रात 104 टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या 108 टक्के पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा पुणे विभागात सरासरीच्या 115 टक्के पडण्याचा अंदाज असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.

12 जूननंतर पुन्हा पाऊस
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, 12 जूननंतर पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा पाऊस सुरू झाल्यानंतर पेरण्या लांबण्याची शक्यता असते. पेरण्या लांबू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीची कामे पूर्ण करावीत. ज्या ठिकाणी वाफसा तयार झाला आहे, तेथे तूर, उडीद, मटकी, चवळी या पिकांची पेरणी केली पाहिजे. मात्र, भारी जमिनींमध्ये वाफशासाठी आणखी दोन ते तीन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फूड अ‍ॅलर्जी आहे की नाही कसे ओळखावे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार फूड अ‍ॅलर्जी आहे की नाही कसे ओळखावे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
आपल्यापैकी अनेकांना धुळीची, धुराची, तसेच पदार्थांची ॲलर्जी होत असते. त्यात असे अनेकजण आहेत जे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचे शौकीन आहेत. अशातच...
वजन कमी करण्यासाठी ‘या’ 5 सवयी अंगीकारा, फक्त एका महिन्यात तुम्हाला दिसतील आश्चर्यकारक परिणाम
फक्त अंडीच नाही तर ‘या’ भाज्या देखील आहेत प्रथिनांचे मुबलक स्त्रोत
अपघाताची जबाबदारी रेल्वे टाळू शकत नाही; अजित पवार यांचे स्पष्ट मत
Skin Care – आंघोळीपूर्वी फक्त या 5 गोष्टी करा, तुमचा चेहरा ब्राइडल फेशियल केल्यासारखा चमकेल!
मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे फक्त प्रचार, मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातावरून राहुल गांधी यांची टीका
टेंभुर्णी- अकलूज मार्गावर दोन दुचाकींची धडक; तिघांचा मृत्यू, दोनजण जखमी