अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीडमध्ये 100 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असणार्या बीड जिल्ह्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखा पालकमंत्री मिळाला आहे. असे असले तरी बीड जिल्ह्याची आवस्था तशीच आहे. पालकमंत्री होऊन अजित पवारांना जवळपास सहा महिने लोटले. या कालावधीत बीड जिल्ह्यातील तब्बल शंभर शेतकर्यांनी गळफस घेऊन जीवन संपवले. कर्ता पुरुष गेल्याने बीड जिल्ह्यातील शंभर कूटूंब उघड्यावर पडले आहेत.
बीड जिल्ह्यात शेतीत काही पिकत नाही,हाताला काम नाही. साडेसहा लाख मजूर दरवर्षी बीड जिल्ह्यातून संपुर्ण राज्यात ऊसतोडीसाठी जातात. ना कोणते उद्योग ना कोणते धंदे, एकीकडे आर्थिक परिस्थिती हालाखीची होत असतांना बीड जिल्ह्यात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर बीड जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघाले आणि धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांची वर्णी लागली. त्यानंतरही बीड जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली. शेतकर्यांकडेही अजित दादांचे साफ दुर्लक्ष राहिले. सहा महिन्यातच बीड जिल्ह्यातील तब्बल शंभर शेतकर्यांनी आर्थिक आडचणीमुळे आणि नापिकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.
बीड मध्ये विमानतळ उभारु इच्छिणार्या अजित दादांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले. पालकमंत्री बदलला तरी बीड जिल्ह्याच्या नशिबी मात्र दुरावस्था कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून झालेल्या धुंवांधार पावसाने कांदा, फळबागा उद्ध्वस्थ झाल्या. कांद्याच्या पिकात चिखल झाला. हजारो शेतकर्यांची शेती वाहून गेली.आत्महत्यांचा आकडा पुन्हा वाढतो की काय अशी भिती आता व्यक्त होऊ लागली आहे.
सततची नापिक, वाढता लागवड खर्च, शेतीमालाला कवडीमोल भाव, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणा या कारणांमुळे सहा महिन्यांमध्ये शंभर शेतकर्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्यांच्या कुटूंबीयांना अद्यापही मदत मिळालेली नाही. पालकमंत्री अजित पवार आणि सरकार अपयशी ठरले.अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List