धुळ्यातील रोकडप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, भास्कर जाधव यांचे विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापतींना पत्र

धुळ्यातील रोकडप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, भास्कर जाधव यांचे विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापतींना पत्र

धुळय़ाच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोटय़वधींच्या रोकडप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना पत्र दिले आहे.

धुळय़ातील घटनेने महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला आणि विधिमंडळाच्या पवित्रतेला कलंक लावला आहे. या प्रकरणात विधिमंडळाच्या अंदाज समिती सदस्यांवर गंभीर आरोप झाले आहेत. सापडलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली होती अशी चर्चा आहे. ती समितीतील सदस्यांना देण्यासाठी ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. तसेच ज्या खोलीत रक्कम आढळली ती अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या नावावर आरक्षित होती. हे अत्यंत धक्कादायक असून विधिमंडळाच्या व्यासपीठाचा सत्ताधाऱयांकडून डीलसाठी वापर केला जातोय हे निंदनीय आहे, असे भास्कर जाधव यांनी या पत्रात म्हटले आहे. कोणताही आमदार, समिती सदस्य किंवा शासकीय कर्मचाऱयाचा या गैरप्रकारात सहभाग असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? बावनकुळेंनी सांगितली आतली गोष्ट भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? बावनकुळेंनी सांगितली आतली गोष्ट
राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून निवडणुकीची तयारी देखील सुरू...
34 वर्षांच्या आयुष्यात मारहाणीपासून वेश्याव्यवसायापर्यंत, मृत्यूंनंतर अभिनेत्रीच्या नशिबात नव्हते चार खांदे
नवऱ्याचे 2 घटस्फोट झाले म्हणून काय, मी तरी कुठे…, मराठमोळ्या अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य
आजवर कधीही न घडलेला चमत्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये अनपेक्षित वळण
मुस्लिम मुलासोबत लग्न, अभिनेत्री 6 महिन्यापूर्वी बनली आई, आता दुसऱ्यांदा प्रेग्नेंट का?
weightloss tips: झटपट वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ तज्ञांच्या सोप्या ट्रिक्स
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आलेल्या 100 कोटींच्या निधीचे काय झाले? शिवसेनेचा सवाल, रेल्वे कार्यालयाबाहेर आंदोलन