मुंबईत कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

मुंबईत कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटाचे घर मिळायला पाहिजे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुंबईत कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, धारावीचा विकास किंवा पुनर्विकास हा होणं गरजेच आहे पण कोणी कितीही बैठका घेतल्या कोणी त्यांच्या मालकांसाठी बैठका घेतल्या तरी धारावीकरांचे जे हक्क आहेत ते तसेच राहिले पाहिजेत. धारावीची 540 एकर अदानीला फुकट दिली. अदानीने बीएमसीचे साडे हजार कोटीच प्रीमियम भरणार नाही असे म्हटले आहे. ही कुठली दादागिरी आहे? मुंबईमध्ये जर टीडीआर कुठच्याही इमारतीला घ्यायचा असेल तर 50 टक्के अदानी ग्रुप कडून घ्यायचा, ही कुठली दादागिरी? धारावीच्या बाहेरची जवळपास 600 एकर जमीन फुकट अदानीच्या घशात घालताय, आम्ही एक इंच तरी फुकटात घेऊ शकतो का? मुळात आमच्या मागण्या याच आहेत की जे काही टेंडरच्या आजूबाजूचं जास्ती त्यांना दिलं जात मग मुलंड, विक्रोळी आणि घाटकोपर असो. उद्या कुलाब्यात येईल कधी विक्रोळीत येईल जिथे अदानी समूह बोट दाखवते तिथे जागा त्यांना मोफत दिली जाते, हे आम्ही चालू देणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे धारावीकरांना 500 स्क्वेर फुट घरं मिळाल पाहिजे. तिथे पोलीस वसाहत तयार करा, तिथे बीएमसी वसाहत तयार करा. कुंभारवाडा कुठे जाणार कोळीवाडा कुठे जाणार लेदर इंडस्ट्री आहे फूड इंडस्ट्री आहे हे कुठे जाणार? स्थानिकांशी बोला दादागिरी आम्ही मुंबईत चालू देणार नाही आणि कुणाच्याही घशात ही मुंबई जाऊ देणार नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच भाजपा 25 वर्ष आमच्या सोबत सत्तेत होती. 25 वर्ष असे हाल झाले नाही जे आता गेल्या तीन वर्षात झाले. भ्रष्टनाथ शिंदेनी 92 हजार कोटीचे जे आम्ही सरप्लस एफडी मग ते पगारांसाठी असेल ग्रॅच्युटीसाठी असेल, पेन्शन साठी असेल एसटीपी साठी साठी असेल कोस्टल रोड असेल जीएम साठी असेल हे सगळे जे होते ते 92,000 कोटीच्या सरप्लस मधून थेट मुंबई महानगरपालिकेला अडीच लाख कोटीच्या डेफिसिट मध्ये टाकलं. म्हणजे उधळपट्टी कशी करायची हे मिंधेंकडून शिका. मी हेच सांगेन की राजकारण जरा बाजूला ठेवा आणि स्वतःची जबाबदारी काय ओळखा असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हिंदमाता असेल, गांधी मार्केट असेल, किंग सर्कल असेल हे आम्ही पूरमुक्त करून दाखवलं होतं. तसच मिलन सबवेमध्येही पाणी भरणार नाही याची काळजी घेऊन तिथे देखील रेन वॉटर होल्डिंग टॅंक बनवले होते. दोन वर्ष पूर आला नाही, याचवर्षी का आला? कारण मॉन्सूनपूर्वीच्या ज्या बैठका असतात त्या झाल्या नाहीत. पंप लावले असतात ते हलवले गेले आणि आम्ही गेल्यानंतर म्हणजे जवळपास पूर्ण पाऊस ओसरल्यानंतर पाणी ओसरल्यानंतर पंप येत होते तिथे ते पंप आल्यानंतर दोन तासानंतर डिझेल ते जनरेटर साठी येत होते. असा कारभार चालू शकत नाही असेही आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Rain Forecast : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हाय अलर्ट IMD Rain Forecast : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हाय अलर्ट
यंदा देशासह महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, सध्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाकडून आता पुन्हा...
अकाऊंट हॅक झालं तर गप्प का बसलात? सुदेश म्हशीलकरांना प्राची पिसाटचा सवाल
‘माझ्यासमोर त्याने पँटमधून ते काढलं…’ तर दिग्दर्शकाकडून जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न…अभिनेत्रीसोबत घडलेत भयानक अनुभव
Ankita Bhandari Case – तीन वर्षानंतर मिळाला न्याय, अंकिताच्या हत्येप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलासह तिघांना जन्मठेप
PETA ने ‘जागतिक दूध दिन’ हे नाव बदलण्याची केली मागणी, वाचा सविस्तर
सुप्रीम कोर्टाच्या ‘मेघा’ दणक्यानंतर MMRDA ताळ्यावर, 14 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांचे टेंडर अखेर रद्द
Hair Care- मेथीदाणे आहेत केसगळतीवर रामबाण इलाज, वाचा