‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक शिंदेंनाही पाठवलं, संकट काळात पळून न जाता लढायचं कसं हे पुस्तक वाचून त्यांनी शिकावं! – संजय राऊत

‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक शिंदेंनाही पाठवलं, संकट काळात पळून न जाता लढायचं कसं हे पुस्तक वाचून त्यांनी शिकावं! – संजय राऊत

‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या संपल्या आहेत. तीनदा पुस्तक छापावे लागले आहे. 10 दिवसांमध्ये पुस्तक तीन वेळा छापावे लागले हा मराठी पुस्तकांच्या बाबतीत विक्रमी प्रसंग आहे. अमेझॉनवर पहिल्या क्रमांकावर चाललेले पुस्तक असून अजूनही देशातून, महाराष्ट्रातून याची मागणी होत आहे. या पुस्तकाचे इंग्रजी अनुकरण जुलै महिन्यात दिल्लीत प्रसिद्ध होईल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होईल, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. ते गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे पुस्तक कुणा कुणाला पाठवले हे देखील सांगितले.

महाराष्ट्रामध्ये ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. अनेकांना या पुस्तकाच्या प्रति पाठवल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना व्यक्तिगत पत्र लिहून हे पुस्तक पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांनाही हे पुस्तक पाठवले आहे. माणसाने संकट काळात पळून न जाता कसे आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि लढायला पाहिजे हे त्यांनी यातून शिकावे. देवेंद्र फडणवीस यांनाही हे बालसाहित्य पाठवले आहे. जे ईडीला घाबरून भाजप, शिंदे गटात किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत अशा सगळ्यांना हे पुस्तक पाठवलेले आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, दिल्लीत गेल्यावर हे पुस्तक प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देता येईल याचीही व्यवस्था करू. त्यांच्यासाठीच हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये करतोय. या पुस्तकाचा जो गाभा आहे, आत्मा आहे तो देशात पोहोचला पाहिजे. याचे कारण असे आहे की, ज्या पद्धतीने सगळ्या विरोधकांवर जुलूम केला गेला आणि त्यातले काही लोक आमच्यासारखे उभे राहिले. मी, दिल्लीत संजय सिंह, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना फार त्रास दिला हे जनतेला कळायला पाहिजे. इतके सगळे घाव झेलूनही आम्ही आजही आमच्या भूमिकेवर ठामपणे उभे आहोत.

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणामध्ये नीतिमुल्ल्यांचे अवमूल्यन चिंताजनक असल्याचे म्हटले. फडणवीसांना नीतिमुल्ल्यांच्या अवमूल्यनाची चिंता वाटते हे वाचून बरे वाटले. ज्यांचे दाऊद इब्राहिम सोबत संबंध आहेत, ज्यांनी भ्रष्ट मार्गाने संपत्ती गोळा केली, ज्यांना मोदी, शहा, फडणवीस यांनी तुरुंगात टाकले हे सगळे लोक आज त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांना रंग सफेदी करण्यासाठी फडणवीस म्हणतात की, नितीमुल्ल्यांच्या घसरणीची मला चिंता वाटते. चिंता वाटते मग ती मूल्य तुम्ही जपली का नाही? सत्तेसाठी तुम्ही स्वत:ला इतक्या खालच्या स्तरावरती का नेले? असा सवाल राऊत यांनी केला.

सत्तेची तहान लागल्यावर कुणी गटारातलं किंवा गढूळ पाणी पित नाही; संजय राऊत स्पष्टच बोलले

दुसरे म्हणजे, 2019 ला उद्धव ठाकरेंनी दगा दिला हे पूर्णपणे चूक आहे. दगा भारतीय जनता पक्षाने दिला. शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता. पण त्यांनी चर्चेची दरवाजे बंद केले. त्यांना आमच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या हे खरे आहे. आमच्या जागा त्यांनी पाडल्या हे ही खरे आहे. पॉवर शेअरिंग 50-50 चा अर्थ त्यांनी महाराष्ट्राला समजून सांगावा. सत्तेचे वाटप समसमान होईल. आता सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही असे त्यांनी सांगितले होते का? मुख्यमंत्रीपद म्हणजे काय धर्मादाय पद नाही. सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपदही आहे. बरं, मग तेच मुख्यमंत्रीपद शिंदेला कसे दिले? तुम्हाला शिवसेनेला द्यायचे नव्हते, पण शिवसेनेतील फुटलेल्या गटाला दिले. तुम्ही तेव्हा उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हते, आमच्या धोरणात बसत नाही सांगितले. आज तुमच्याकडे दोन-दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि भुजबळांच्या नावाचातिसरे उपमुख्यमंत्री म्हणून विचार सुरू आहे, हे चालते का? तुम्ही दगा देण्याच्या विचारानेच ते राजकारण करत होते. शिवसेनेला दगा द्यायचा, भविष्यात तुकडे करायचे, त्यानुसार तुमची आखणी आणि मांडणी सुरू होती, असेही राऊत म्हणाले.

‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 7 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Rain Forecast : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हाय अलर्ट IMD Rain Forecast : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हाय अलर्ट
यंदा देशासह महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, सध्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाकडून आता पुन्हा...
अकाऊंट हॅक झालं तर गप्प का बसलात? सुदेश म्हशीलकरांना प्राची पिसाटचा सवाल
‘माझ्यासमोर त्याने पँटमधून ते काढलं…’ तर दिग्दर्शकाकडून जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न…अभिनेत्रीसोबत घडलेत भयानक अनुभव
Ankita Bhandari Case – तीन वर्षानंतर मिळाला न्याय, अंकिताच्या हत्येप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलासह तिघांना जन्मठेप
PETA ने ‘जागतिक दूध दिन’ हे नाव बदलण्याची केली मागणी, वाचा सविस्तर
सुप्रीम कोर्टाच्या ‘मेघा’ दणक्यानंतर MMRDA ताळ्यावर, 14 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांचे टेंडर अखेर रद्द
Hair Care- मेथीदाणे आहेत केसगळतीवर रामबाण इलाज, वाचा