मुंबईत मोकळी जागाच राहणार नाही, अतिक्रमणांवरून हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

मुंबईत मोकळी जागाच राहणार नाही, अतिक्रमणांवरून हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

सार्वजनिक भूखंडावरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे रोखण्यात राज्य शासन व सरकारी अधिकारी अपयशी ठरले तर भविष्यात मुंबई व आसपासच्या परिसरात मोकळी जागाच राहणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने खडसावले.

सार्वजनिक मोकळय़ा जागेचा वापर हा लोकांसाठीच झाला पाहिजे. नफेखोर किंवा अतिक्रमण करणाऱयांकडून मोकळय़ा भूखंडाचा गैरवापर होता कामा नये याची काळजी राज्य शासन व सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी, असेही न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वेत सेठना यांच्या खंडपीठाने बजावले.

काय आहे प्रकरण…

चारकोप येथील लक्षण भंडारी चाळीतील काही रहिवाशांनी त्यांच्या घरांवरील कारवाईविरोधात याचिका केली होती. आमच्या झोपड्या 2000 सालच्या आधीपासून आहेत. आमचे पुनर्वसन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यात केली होती. मात्र हे सरकारी जागेवर अतिक्रमण आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ देता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

पुनर्वसनाच्या लोभाने अतिक्रमण करू नका

भविष्यात पुनर्वसन होईल या लोभाने लोकांनी मोकळय़ा भूखंडांवर अतिक्रमण, बेकायदा बांधकामे करू नयेत. अनधिकृत बांधकामे न करणे ही नागरिकांचीदेखील नैतिक जबाबदारी आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

वेळीच कारवाई होत नाही

अनधिकृत बांधकामांवर राज्य शासन व महापालिका वेळेवर कारवाई करत नाही. त्यामुळे तेथे राहणाऱ्यांचा समज होतो की, आपला त्या जागेवर हक्क निर्माण झाला आहे. याच गैरसजातून उच्च न्यायालय व अन्य न्यायालयात खटले दाखल होतात, असेदेखील खंडपीठाने नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय
मुंब्रा स्थानकादरम्यान अपघात होऊन सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्याच्या लोकल असतील असा निर्णय घेण्यात...
मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज
Monsoon Trekking- पावसाळी ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या
प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;चित्रपटसृष्टीवर शोककळा
आलिया भट्ट-रणबीर कपूरचा 250 कोटींचा बंगला तयार, मात्र नवीन गेट बांधण्यासाठी पैसे नाहीत! वाचा
गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान